शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 19:13 IST

forest department Kolhapur- हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.

ठळक मुद्देहत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली नुकसानग्रस्त भागास भेट

कोल्हापूर : हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.दरम्यान, हा हत्ती ज्या मार्गाने वस्तीत आला होता, त्याच मार्गाने त्याला गुरुवारी वन विभागाच्या ५२ वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलाकडे मार्गस्थ केले. आता या हत्तीचा आजरा तालुक्यातील अरळकुंडी परिसरात मुक्काम आहे.या नुकसानग्रस्त भागास आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक आर. आर. काळे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी फिरत्या पथकाचे वनपेत्रपाल युवराज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकरही उपस्थित होते.पंधरा दिवसात भरपाई देण्याचे नियोजनपंचनामे लवकरात लवकर कन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसात भरपाई देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून आठ दिवसांत भरपाई देण्यासाठी वन खाते प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेऊन हत्तीप्रवण भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.वनविभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत राहणारनुकसानग्रस्त भागात वनविभागाचे स्वतंत्र पथक गस्तीसाठी कार्यरत राहणार असून पुन्हा हत्तीचे दर्शन झाल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीने नुकसान केले आहे, त्यांनी तत्काळ वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनवले यांनी केले आहे.कोटजंगल परिसरातील वन्यप्राणी नागरी वस्तीत वारंवार येत असतात. अशावेळी ग्रामस्थांनी गर्दी करू नये. यावेळी हत्तीला आवरण्याऐवजी बघ्यांची गर्दीच नियंत्रित करण्यासाठी वन विभागाची शक्ती खर्च झाली. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून ग्रामस्थांनी वन्यप्राणी आढळल्यास गर्दी करू नये, संयम बाळगावा.- सुधीर सोनवले,परिक्षेत्र वन अधिकारी, करवीरकोल्हापूर वन विभाग(संदीप आडनाईक)

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर