शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

हातकणंगलेत २५ गावांत शेतकरी कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुका महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. पंचगंगा,वारणा नदीच्या महापुरामुळे २५ गावांना फटका बसला आहे. ७ गावांचा संपर्क तुटला आहे. ७ हजार ५२ हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत.यामध्ये ऊस २१८९ हेक्टर

, भुईमूग १९०८, सोयाबीन २४४७ ,भाजीपाला १९८,भात १०१ इतर पिके १०० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. पुरामुळे रुई -पट्टणकोडोली, पारगाव - निलेवाडी, खोची -दुधगाव, कुंभोज- सावळवाडी, इचलकरंजी -रेंदाळ -रांगोळी आदी प्रमुख मार्ग बंद आहेत. आजअखेर १०१५२ कुटुंबातील ४२ हजार १८६ नागरिकांनी स्थलांतर केले असून पंचगंगेच्या महापुरातील १० गावातील ७०८० कुटुंबे आणि वारणा महापुरातील ११ गावातील २०७२ कुटुंबे अशी तालुक्यातील २१ गावातील १०१५२ कुटुंबे एन.डी.आर.एफ. आणि स्थानिक मदतीने नातेवाईक आणि शासकीय निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केली आहेत.

नवा रस्ता शेतीच्या मुळावर

पूरबाधित गावात रस्ता करत असताना रस्त्याची उंची वाढणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असते,परंतु याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात रस्त्याची उंची वाढवल्याने भादोले, किणी,घुणकी,चावरे, पारगाव, निलेवाडी येथील शेती मोठ्या प्रमाणात पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.