शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार?

By admin | Updated: July 21, 2016 22:09 IST

शिरोळ तालुक्यातील चित्र : पेरणी दाखला मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप

संदीप बावचे--  जयसिंगपूर --‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ याचा अनुभव शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. पीक पेरणी दाखला तलाठ्यांकडून मिळत नसल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ३१ जुलै २०१६ पर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय पुरामुळे नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याकडे त्याचे लक्ष लागून राहिले आहे. संततधार पाऊस आणि कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जून महिन्यात सोयाबीन, भात, भुईमूग, उडीद, मूग, मिरची, आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली होती. पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातच जुलैअखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. मात्र, जिल्हा बँक असो वा नॅशनल बँक याठिकाणी शेतकऱ्यांना पीक पेरणी दाखल्याशिवाय पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. पुरामुळे नुकसान झालेले पंचनामेदेखील अद्याप झाले नसल्यामुळे स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसीलवर आपला मोर्चा वळविला.यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महावीर चौगुले, बाबू मालगावे, संदीप कगुडे, महावीर आडगाणे, महावीर माणगावे, अजित मालगावे, सुभाष चौगुले, मारुती पुजारी, रघुनाथ बिरोजे, आदी उपस्थित होते. टाळे ठोक आंदोलनपुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे करावेत, पीक पेरणी दाखला तातडीने मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने शिरढोण गावचावडीला टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. वास्तविक पीक पेरणी दाखला देण्याची जबाबदारी तलाठ्यांची असते. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने आम्ही हे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी विश्वास बालिघाटे यांनी दिली. दहा दिवस राहिलेराष्ट्रीय कृषी विमा रद्द करुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा सर्व शेतकऱ्यांना योजना बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.