शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

शेळपबांबर ता, राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2023 15:14 IST

गौरव सांगावकर  लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी: राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणेपैकी बांबर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ...

गौरव सांगावकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी: राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणेपैकी बांबर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थ आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.

हसणेपैकी बांबर येथील शेतकरी प्रकाश महादेव म्हाबळे (वय ७०) हे सकाळी साडेअकराच्या दरम्यान जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता झुडपातुन अचानक गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.यानंतर त्यांना जवळच्या दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी दवाखाना बंद असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, या ठिकाणी त्यांना उपचार करून पुढील उपचारास कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.

अभयारण्य क्षेत्रात असलेल्या शेळप,बांबर, हसणे, ओलवन, मांढरेवाडी व दाजीपूर परिसरातील वाड्यावस्त्या वरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे अपघात झाल्यास लोकांना प्राथमिक उपचार वेळेत न मिळाल्याने काही रुग्णांना वेळेत उपचार घेता येत नाही, त्यामुळे दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करून सुरू करण्याची मागणी हसणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पूजा शरद पाटील व ग्रामस्थांनी केली आहे,तसेच वनविभागाकडून जखमींला तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली आहे.