शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

शेतमाल सडतोय 'शेतातच', लाॅकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच ...

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच झालेला नाही. त्यामुळे हे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, तर हा नाशिवंत माल असल्याने याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी किमतीत मागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. याबाबत ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा हेच लॉकडाऊन शेतकऱ्यांची आर्थिक साखळी विसकटायला कारणीभूत ठरणार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.

बानगे (ता.कागल) येथिल कलिंगड उत्पादक शेतकरी विजय सुभाष चव्हाण यांनी चार वर्षांपासून कलिंगडसह वांगी, भेंडी आदी भाजीपाला पिके घेतली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी कलिंगड अगदी विनामूल्य देण्याची वेळ आली, तर यंदाही तीच स्थिती आहे.

गत महिन्यात दीड एकरातील कलिंगड अत्यल्प दरात दिले. आता अडीच एकरातील कलिंगड काढणीवर आले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी लाँकडाऊनचे कारण सांगून मालाची उचलच केलेली नाही. त्यामुळे हा माल शेतातच सडत पडला आहे.

रोपाची किंमत तीन आणि कलिंगडची चार..

लाॅकडाऊनमुळे मागणी कमी झाली असल्याचे सांगत व्यापारी चार रुपयांनी प्रतिकिलो कलिंगड मागत आहेत; परंतु एका रोपाची किंमतच ३ रुपये आहे. खते, औषधे, ठिबक यासह एकूण एकरी ७५ हजार खर्च येत आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फिटणार कसे, या विवंचनेत आहे. शेतकऱ्यांबाबत शासनाचे धोरणच नसल्याचे सांगत विजय चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लारूकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच पूर्वानुभवावरून यंदा अगोदर शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करा. मगच लाॅकडाऊन करा, असे बजावले होते. शासनाने गांभीर्याने घेऊन शेतमालाची विक्री व्यवस्था करावी किंवा पंचनामे करून त्यांना जागेवरच नुकसान भरपाईचा धनादेश द्यावा. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.

-सागर कोंडेकर

जिल्हा उपाध्यक्ष युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना

कॅप्शन

बानगे येथील विजय चव्हाण यांनी कलिंगड काढून असा ढीग केला आहे. व्यापारी न आल्याने ताडपदरी, नारळीच्या पानांनी झाकले आहेत.

छाया-दत्तात्रय पाटील