शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

चंदगडमध्ये गणपती बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

श्रींची भक्तिमय वातावरणात दहा दिवस पूजा करून, जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ...

श्रींची भक्तिमय वातावरणात दहा दिवस पूजा करून, जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. कोरोनाचा काळ असल्यामुळे यंदा प्रशासनासचे नियम पाळावे लागले. कोणताही गाजावाजा न करता यंदा सर्वच सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपतीचे विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.

घटप्रभा व ताम्रपर्णी नदी काठावर कानडी, माणगाव, दुंडगे, मजरे कारवे यांसह अनेक ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी घाट बांधावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मात्र, प्रशासन त्याकडे कायमच दुर्लक्ष करत आले आहे. दरवर्षी गणेश विसर्जन आले की, हा विषय चर्चेत येतो. नंतर मात्र, प्रशासनाला यांचा विसर पडत आहे. त्यामुळे यंदाही घाट नसल्याने बाप्पाचे विसर्जन करताना खूप अडचणी येत होत्या.

नदीवर बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीम हजर होती.

रविवारी विसर्जनाच्या वेळी चंदगड, माणगाव, मजरे कारवे, अडकूर, कानूर, गवसे, नागणवाडी, शिरगाव, पाटणे, पार्ले, कोदाळी, जंगमहट्टी, तावरेवाडी, मौजे कारवे, यशवंतनगर, तुडये, दाटे, हलकर्णी, धुमडेवाडी, तुर्केवाडी, शिनोळी, देवरवाडी, सातवणे, कानडी, पोवचीवाडी, कानडी, केरवडे, गंधर्वगड, वाळकुळी, शिवणगे, कोवाड, कुदनूर व कालकुंद्रीसह अनेक गावांतील मंडळांनी सार्वजनिक, तसेच घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन केले.

कोरोनाचे विसर्जन व्हावे

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरानाचा सामना करत आहे. त्यामुळे आता तरी गणरायाने आपल्यासोबत कोरोनाचे विसर्जन करून करावे, जेणेकरून सर्वच गोष्टी पूर्ववत होईल, अशी मागणी यावेळी गणेशभक्तांनी गणरायाकडे केली.

फोटो ओळी : कानडी येथे घटप्रभा नदीला घाट नसल्याने, रविवारी गणेशमूर्ती विसर्जन करताना गणेश भक्तांना अशी कसरत करावी लागली.

क्रमांक : २००९२०२१-गड-०१