शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

चिरमुऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूर शहरात चिरमुऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूर शहरात चिरमुऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. इराणी खणीत शिस्तबध्द विसर्जन करण्यात आले. शहरातील पेठा व चौका-चौकात विसर्जन कुंड केले होते, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, तिथेही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्ती दान केल्या.

इराणी खणीच्या सभोवती कनात बांधली होती. राजकपूर पुतळा मार्गावरील वाहतूक देशमुख हॉल चौकातून वळवण्यात आली होती. क्रशर चौकातून फक्त गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. खणीवर महापालिकेच्या यंत्रणेकडून मूर्ती गोळा करून त्या तराफावरून खणीत सोडल्या जात होत्या. दुपारी अडीचपासून बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक इराणी खणीकडे येत होते. सायंकाळी पाचनंतर गर्दी वाढू लागली. मूर्ती ताब्यात दिल्यानंतर गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय होती. सायंकाळी सातपर्यंत ही गर्दी कायम राहिली.

संभाजीनगर, शहाजी वसाहत, फिरंगाई, मिरजकर तिकटी आदी शहरातील प्रमुख चौकात विसर्जन कुंड करण्यात आले होते. येथेही नागरिक मूर्ती विसर्जित करून मूर्ती दान करत होते. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

टेंपो, रिक्षा, दुचाकीतून बाप्पाला निरोप

टेंपो, रिक्षा, कार, दुचाकीतून आणून अनेकांनी बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांचा गजर, चिरमुऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष करत बालचमूंसह वयोवृध्द भक्तिमय वातावरणात विसर्जनासाठी आले होते.

पावसाने उघडीप दिल्याने सहकुटुंब विसर्जनासाठी

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे बाप्पांचे विसर्जन कसे करायचे? असा प्रश्न भक्तांसमोर होता. मात्र मंगळवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप राहिली. त्यात कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने बाप्पाला निरोप देण्यासाठी सहकुटुंब आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

बाप्पाच्या विसर्जनावेळी मास्कचा विसर

कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक काहीसे बिनधास्त झाल्याचे पाहावयास मिळते. गणपती विसर्जनावेळी अनेकांच्या तोंडाला मास्कच दिसत नव्हता.

इराणी खणीभोवती पोलिसांचे कडे

इराणी खणीला चोहोबाजूने कणात मारली होती. मूर्ती विसर्जनासाठी दोन मार्ग होते, पोलिसांनी विचारपूस केल्यानंतरच मूर्ती घेऊन खणीकडे जाता येत होते. खणीच्या सभोवती पोलिसांचे कडेे होते.