स्वातंत्र्यपूर्व काळात शहरावर पटवर्धन सरकारचे राज्य होते. राजाच्या राजवाड्यात गणेश मंदिर असून गणेशोत्सव काळात दीड दिवसाचा गणपती बसवण्यात येतो. संस्थान खालसा झाल्यानंतर पटवर्धन सरकारच्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी राजवाडा पाडून अपार्टमेंट उभे राहिले असलेतरी गणेश मंदिर बांधून त्याठिकाणी आजही गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून दीड दिवसानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.
सायंकाळी पटवर्धन सरकार परिवाराकडून गणेशमूर्तीची पूजा करून कृष्णा घाटावरून नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. या वेळी भालचंद्रराव पटवर्धन, राधिकादेवी, युवराज रघुराजे, राजकुमारी राजसीदेवी उपस्थित होते.
फोटो - ११०९२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड शहरातील राज घराण्यातील दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नेण्यात आले.