शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दर्शन मंडपासाठी फरासखान्याचा विचार

By admin | Updated: January 5, 2017 00:59 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखडा : बैठकीत सादरीकरण; येत्या आठवड्याभरात निर्णय घेणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत दर्शन मंडप म्हणून जुना राजवाडा पोलिस ठाण्याला लागून असलेल्या फरासखान्याचा विचार करण्यात येत आहे. त्यावर बुधवारी झालेल्या बैठकीत वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी ही हेरिटेज इमारत दर्शन मंडप म्हणून कशी विकसित करता येईल यावर सादरीकरण केले. अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा, विद्युत रोषणाईच्या निविदा, यासह विविध विषयांवरील चर्चेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नूतन सदस्य सुभाष वोरा, शिवाजी जाधव, संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, प्रमोद पाटील, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, उपअभियंता सुदेश देशपांडे, आदी उपस्थित होते. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर दर्शन मंडप बांधण्यास विरोध होत आहे. त्यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्याला लागून असलेल्या फरासखान्यालाच दर्शन मंडपाचे स्वरुप देता येईल, असा प्रस्ताव अमरजा निंबाळकर यांनी मांडला होता. बुधवारी त्यांनी त्याचा संपूर्ण आराखडा समितीसमोर सादर केला. ही जागा छत्रपती घराण्याच्या मालकीची आहे शिवाय ती महापालिकेच्या हद्दीत येते त्यामुळे यावर महापालिकेकडून सिटी सर्व्हेचा अहवाल मागविण्यात येणार आहे. जागेचे अंदाजपत्रक अशा तांत्रिक बाबींचा विचार करून येत्या आठवड्याभरात त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विद्युत रोषणाईसाठी काटेकोर नियम..अंबाबाई मंदिर सुशोभीकरणांतर्गत मंदिराचे शिखर, गरुड मंडप व परिसर येथे करण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाईसाठी देवस्थान समितीतर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. बुधवारी झालेल्या बैठकीत तीन निविदांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराचे प्राचीनत्व लक्षात घेऊन त्या पुरातन बांधकामावर विद्युत रोषणाईचा परिणाम होणार नाही, खूप जास्त उजेडाचा भाविकांच्या डोळ््यांवर ताण येणार नाही, हेरिटेज वास्तूंसाठी ‘युनिस्को’ने दिलेल्या नियमांचे पालन याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी या रोषणाईत एलईडी बल्ब वापरण्यात येणार आहे शिवाय ही रोषणाई रनिंग स्वरुपात नसणार आहे. या सर्व अटी आणि बाबींची पूर्तता करू शकणाऱ्या कंपनीलाच याचा ठेका देण्यात येणार आह