शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कुरघोडीच्या राजकारणात विकास राहिला दूर--अनेक प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:36 IST

पाचगाव -- निवडणुका आटोपल्या की पक्षीय राजकारण संपवून विकासाची गोळाबेरीज सुरू होणे अपेक्षित असते. मात्र सध्या उलटे चक्र सुरू झाले

ठळक मुद्देदक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगावची स्थितीखुल्या जागा अनेक राजकीय मातब्बरांनी ग्रामपंचायतीपासून संंबंधित प्रशासनाला हाताशी धरून गिळंकृत केल्या आहेत डोक्यात केवळ राजकारण आणि राजकारणाचा विचार असतो

पाचगाव -ज्योती पाटील-  :      निवडणुका आटोपल्या की पक्षीय राजकारण संपवून विकासाची गोळाबेरीज सुरू होणे अपेक्षित असते. मात्र सध्या उलटे चक्र सुरू झाले असून पाचगावचे राजकारण कूरघोडीच्या मार्गाने चालले आहे. पाच वर्षे कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांच्या डोक्यात केवळ राजकारण आणि राजकारणाचा विचार असतो. मतांचे राजकारण लक्षात घेऊन विकासाचे नियोजन केले जाते. त्यामुळे असमतोल विकास महत्त्वाच्या प्रश्नांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाचगावमधील पक्षीय व गटातटाच्या राजकारणातील कूरघोड्यांमुळे विकास दूर असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन्ही परिणाम सामान्य माणसांवर होत आहेत.

पाचगावचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अतिसंवेदनश्ील म्हणून ओळखल्या जाणाºया पाचगावमध्ये सध्या कूरघोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. केंद्र व राज्यशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करून घेण्यापेक्षा त्यात अडथळे आणण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामध्ये गटातटांमध्ये वाद कायम पेटता रहात आहे.

पाचगावच्या पाणी प्रश्नावर अनेकांनी राजकारण करून आपापली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे चित्र आहे. पाचगावसाठी आणलेली २२ कोटींची महाराष्टÑ जीवनर प्राधिकरणची पाणी योजना अवघ्या सहा कोटींवर आणून काम पूर्ण केले खरे; परंतु पाचगावकर अजूनही तहानलेलेच आहेत. ऐन पावसाळ्यातदेखील पाचगावकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्यासाठीचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी आढावा घेऊनही अनेक कामे मार्गी लावलेली नाहीत. गावातील अस्वच्छता, गावातील खुल्या जागांचे असणारे प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. अनेक ठिकाणच्या खुल्या जागा अनेक राजकीय मातब्बरांनी ग्रामपंचायतीपासून संंबंधित प्रशासनाला हाताशी धरून गिळंकृत केल्या आहेत, हे वास्तव आहेत. त्यामागील कारणमिमांसा धक्कादायक ठरणाºया आहेत.

पाचगाव हे राजकीयदृष्ट्या सतेज पाटील गट व महाडिक गट अशा दोन्ही गटांत विभागले आहे. सध्या पाचगावच्या सरपंचपदाची धुरा महाडिक गटाकडे आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद भाजपप्रणित महाडिक गटाच्या ताब्यात आहे. आमदार भाजपप्रणित महाडिक गटाचे, खासदार राष्टÑवादीचे असले तरी महाडिक गटाचेच त्यामुळे सरपंचांपासून खासदारांपर्यंत सर्व महाडिक गटाकडे सत्ताकेंद्रे आहे. तसेच राज्यात व केंद्रांतदेखील सत्ता भाजपची म्हणजे महाडिक गटाश्ी संबंधित तरीदेखील अनेक प्रश्न प्रलंबितच का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय रहात नाही. तसेच सतेज पाटील हेदेखील एकेकाळी आमदार व मंत्री होते. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत. पाचगावकरांच्या जिवांवर अनेकांनी राजकारण केले; परंतु त्याचा मोबदला पाचगावला पाहिजे तसा झाला नाही.श्रेयवादाचे राजकारण करणाºया व जनतेच्या बळावर निवडून येणाºया जनतेच्या कररूपी पैशातून विकासकामे करण्याची आश्वासने देणाºया लोकप्रतिनिधींना जागे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.दरवेळी नवीन वायदेपाचगावच्या पाण्यासाठी दरवेळी नवीन वायदे होताना दिसत आहेत. सत्ताधारी मंडळी रोज एक वायदा जनतेच्या पदरात टाकत आहेत. वायद्याचा मुहूर्त जवळ आला की जनतेच्या अपेक्षा वाढतात; तेवढ्यात नवीन वायदा केला जातो. याविषयी तक्रारी करणारे लोक आता थकले आहेत.