शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लांडगे कुटुंबीय वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 12, 2014 23:19 IST

उचगाव येथील साक्षी मृत्यू प्रकरण : शासकीय अधिकाऱ्यांना सोयरसुतक नसल्याचे चित्र

शिवाजी कोळी - वसगडे ‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे दहा महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या उचगाव (ता. करवीर) येथील साक्षी विजय लांडगे या चिमुकलीच्या नातेवाइकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. महावितरणच्या कार्यालयापासून पोलीस ठाणे ते गृह सचिवालयापर्यंत शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही अधिकाऱ्यांना माणुसकीचा अजून साधा पाझरही फुटला नसल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे साक्षीच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उचगाव येतील वसंत प्लाझाजवळ दुर्देवी साक्षीचे कुटुंबीय राहतात. साक्षी इंदुमती गर्ल्स हायस्कू लमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होती. ती अत्यंत गोंडस, हसरी स्वभावाची अन् हुशार होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या वडील विजय लांडगे यांचा पानपट्टीचा व्यवसाय असून, १३ आॅक्टोबर २०१३ ची रात्र मात्र लांडगे कुटुंबीयांना ‘काळरूपी’ च ठरली.रात्री पावणेदहाच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर साक्षीची आई अर्चना व आजी मालन लोखडी जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर गेल्या. त्यांच्या पाठोपाठ साक्षीही जात असताना जिन्याजवळ असणाऱ्या लोखंडी पाईपला अनवधानाने साक्षीचा हात लागल्यामुळे जीआय वायर हलून खांबाजवळ विद्युतभारित होऊन प्रवाहित झाली. अन् साक्षीला जोराचा झटका बसून ती खाली कोसळली. तिला वाचविण्यासाठी नातेवाइकांनी जिवाचे रान केले; पण काही उपयोग झाला नाही. झालेल्या प्रकारामुळे लांडगे कुटुंबीय पुरते हादरून गेले.साक्षीच्या मृत्यूला ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्याने विजय लांडगे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात महावितरणच्या विरोधात तक्रार दिली; पण अद्याप त्यांना एफ.आय.आर.ची प्रत पोलिसांनी दिलेली नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विद्युत लोकपाल, विद्युत अभियंता, राज्य मानवाधिकार आयोग, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री किंबहुना लोकशाही दिनात सुद्धा तक्रार दिली; पण केवळ ‘पोच’ देण्यापलीकडे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे लांडगे यांचे मत आहे. महावितरणकडून लांडगे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी साक्षीचे वडील विजय लांडगे यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल, असे कार्यकारी अभियंता व्ही. एस. माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.