शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

धर्मांध शक्ती, हुकूमशाहीचा बीमोड करा-निर्धार परिषदेत सामुदायिक शपथ; मुक्ती दलातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:47 IST

लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे.

कोल्हापूर : लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे. अशा शक्तींचा बीमोड केल्याशिवाय आम्हाला, गुलामी संपूर्ण विकास समान विकास प्रत्यक्षात आणताच येणार नाही.

या शक्तींचा बीमोड करण्याची सामुदायिक शपथ बुधवारी घेण्यात आली. निमित्त होते निर्धार परिषदेचे.श्रमिक मुक्ती दल, निर्मिती विचारमंच आणि समविचारी संघटना यांच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त या निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत होते.

पाटणकर म्हणाले, देशात सर्वत्र सध्या लहान-मोठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांना अडथळे आणून ती मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनता आपल्या हक्कांची आंदोलने थांबविणार नाही. जनतेचा विकास होण्यासाठी केवळ घोषणाबाजी नको; प्रत्यक्षात विकास होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

जातीय, धर्मांध ज्या शक्ती विकासाच्या आड येत आहेत, त्यांना आम्ही आडवे केल्याशिवाय गप्प राहणार नाही.संपत देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अनिल म्हमाने यांनी आभार मानले. याप्रसंगी मोहन अनपट, मोहनराव यादव, वसंत पाटील, दिलीप पाटील, डी. के. बोडके, मारुती पाटील, दिलीप गायकवाड, नजर चौगुले, आनंदा मकर, आदी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाहिरी जलशाला उत्स्फूर्त प्रतिसादशाहीर संभाजी भगत यांनी, येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. बुद्धांनी युद्धविरोधी भूमिका घेतली. काही वेळात देशात धर्म उभा केला जातो. आपण पायाभूत काम केले पाहिजे, अशी भूमिका शाहिरी जलशाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली. तिला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.