शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने स्थानिक भाजीपाल्याची आवक काहीशी वाढली असून, दरात थोडी घसरण झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने स्थानिक भाजीपाल्याची आवक काहीशी वाढली असून, दरात थोडी घसरण झाली आहे. वांगी, घेवडा, गवार, कारली, वरणा, दोडक्याचे दर तुलनेत कमी झाले आहेत. कडधान्य मार्केट एकदम शांत असून, सरकी तेल, साखरेच्या दरातही फारसा चढउतार दिसत नाही. ओल्या भुईमूग शेंगाची आवक चांगली असून, घाऊक बाजारात ३२ रूपये किलो दर मिळत आहे.

पंधरा दिवस पावसाने उसंत घेतल्याने स्थानिकसह सांगली, कर्नाटकात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत भाज्यांची आवक तुलनेत वाढली आहे. आता पावसाची सुरुवात झाली असली तरी त्याचा आवकेवर लगेच परिणाम होत नाही. वांगी, घेवडा, गवार, कारली, वरणा, दोडका, वालची आवक काहीशी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात वांगी २२, घेवडा २०, गवार ३०, कारली २०, दोडका १७ तर वाल दर ३५ रूपये किलो राहिला आहे. किलोमागे साधारणत: पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटो, ढब्बू, भेंडीचे दर स्थिर राहिले आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्याने घाऊक बाजारात दर निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात दहा रुपये असणारी मेथी साडेसहा रुपयाला झाली आहे. पालक साडेसहा रुपयांचा साडेतीन रुपये तर पोकळा सहा रुपयांचा पाच रुपये झाला आहे. शेपूच्या दरात एकदमच घसरण झाली असून, नऊ रुपये पेंढीवरुन अडीच रुपये दर झाला आहे. बाजार समितीत कोथिंबीरची आवक रोज ६८ हजार पेंढ्या होत आहे. त्यामुळे दर शेकडा ६५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

फळ मार्केटमध्ये तोतापुरी आंबा व अननसची आवक वाढली कायम आहे. पेरु, डाळींब, सफरचंदाचीही रेलचेल आहे.

कांदा, बटाटा स्थिर

कांद्या, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. बटाटा घाऊक बाजारात १३ रूपये तर किरकोळमध्ये २० रूपये किलोपर्यंत आहे. कांदाही १५ ते २० रुपये किलो आहे. लसूण दर ६० रूपये किलो राहिला आहे.

फोटो ओळी : जिल्ह्यात ओल्या भुईमूग शेंगांची आवक चांगली आहे. रविवारी भाजी मंडईत टपोऱ्या शेंगांना मागणीही अधिक राहिली. (फोटो-११०७२०२१-कोल- बाजार) (छाया- नसीर अत्तार)