शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

आडवे येणाऱ्यांना पोलिसी खाक्या

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : विभागीय आयुक्ताचा इशारा; ‘एसटीपी’ला शेतकऱ्यांचा खोडा ;१२०० मीटर पाईपचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण कमी करण्यात ‘मैलाचा दगड’ ठरणाऱ्या कसबा बावडा येथील ७६ दशलक्ष सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या पाण्याचे वहन करण्यासाठी आवश्यक दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामात शेतकऱ्यांचा मोठा अडथळा येत आहे, अशी तक्रार पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्यापुढे महापालिका प्रशासनाने आज, रविवारी रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या आढावा बैठकीत केली. नदी प्रदूषण मुक्तीच्या आडवे येत पाईपलाईन रोखणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. त्यामुळे कासवगतीने सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामास गती येऊन एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.महापालिकेतर्फे कसबा बावडा येथे गेली तीन वर्षे सांडपाणी प्रक्रिया कें द्र उभारणी सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातून पंचगंगेत मैलामिश्रीत मिसळणारे तब्बल ७५ टक्के पाणी बंद होणार आहे. एसटीपी केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे. १२ एमएलडीप्रमाणे पाणी शुद्ध करणारे सहा बेसीन तयार आहेत. जयंती नाल्यातून उपसा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असूनही हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी गेली सहा महिने सांडपाणी केंद्र २५ टक्के क्षमतेनेच सुरू आहे.सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया होणारे पाण्याचा बीओडी कमी असल्याने हे पाणी थेट नदीत मिसळल्यास पाण्यातील जैव नैसर्गिकतेला धोका निर्माण होणार नाही. मात्र, हे पाणी वाहून नेण्यासाठी दोन किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याच्या कामास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या विरोधामुळेच गेल्या सहा महिन्यांत फक्त ८०० मीटरच पाईपचे काम होऊ शकले आहे. अद्याप १२०० मीटरच्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. ऊस तोडणीमुळेही हे काम संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांची ऊस तोडणी त्वरित करण्याबाबत राजाराम कारखान्याने सहकार्य केले आहे तरीही काही शेतकरी पाईपलाईनच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत, अशी तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एस. चोक्कलिंगम् यांच्याकडे केली. पाईपलाईनच्या कामात अथडळा आणल्यास त्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. पोलिसांच्या मदतीने पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत व सुरळीत पार पडेल, अशी मनपा प्रशासनास आशा आहे. (प्रतिनिधी)