शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आडवे येणाऱ्यांना पोलिसी खाक्या

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : विभागीय आयुक्ताचा इशारा; ‘एसटीपी’ला शेतकऱ्यांचा खोडा ;१२०० मीटर पाईपचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण कमी करण्यात ‘मैलाचा दगड’ ठरणाऱ्या कसबा बावडा येथील ७६ दशलक्ष सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या पाण्याचे वहन करण्यासाठी आवश्यक दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामात शेतकऱ्यांचा मोठा अडथळा येत आहे, अशी तक्रार पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्यापुढे महापालिका प्रशासनाने आज, रविवारी रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या आढावा बैठकीत केली. नदी प्रदूषण मुक्तीच्या आडवे येत पाईपलाईन रोखणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. त्यामुळे कासवगतीने सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामास गती येऊन एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.महापालिकेतर्फे कसबा बावडा येथे गेली तीन वर्षे सांडपाणी प्रक्रिया कें द्र उभारणी सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातून पंचगंगेत मैलामिश्रीत मिसळणारे तब्बल ७५ टक्के पाणी बंद होणार आहे. एसटीपी केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे. १२ एमएलडीप्रमाणे पाणी शुद्ध करणारे सहा बेसीन तयार आहेत. जयंती नाल्यातून उपसा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असूनही हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी गेली सहा महिने सांडपाणी केंद्र २५ टक्के क्षमतेनेच सुरू आहे.सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया होणारे पाण्याचा बीओडी कमी असल्याने हे पाणी थेट नदीत मिसळल्यास पाण्यातील जैव नैसर्गिकतेला धोका निर्माण होणार नाही. मात्र, हे पाणी वाहून नेण्यासाठी दोन किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याच्या कामास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या विरोधामुळेच गेल्या सहा महिन्यांत फक्त ८०० मीटरच पाईपचे काम होऊ शकले आहे. अद्याप १२०० मीटरच्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. ऊस तोडणीमुळेही हे काम संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांची ऊस तोडणी त्वरित करण्याबाबत राजाराम कारखान्याने सहकार्य केले आहे तरीही काही शेतकरी पाईपलाईनच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत, अशी तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एस. चोक्कलिंगम् यांच्याकडे केली. पाईपलाईनच्या कामात अथडळा आणल्यास त्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. पोलिसांच्या मदतीने पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत व सुरळीत पार पडेल, अशी मनपा प्रशासनास आशा आहे. (प्रतिनिधी)