शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे फडणवीसांनी सिद्ध केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST

बेळगाव : महाराष्ट्रात मागील ५ वर्षे सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या ...

बेळगाव : महाराष्ट्रात मागील ५ वर्षे सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले होते. आता भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे येऊन मराठी भाषिकांबरोबर आपण नाही आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

बेळगाव येथे काही खासगी कामानिमित्त आले असता बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी हॉटेल मेरियट येथे ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि माननीय शरद पवार साहेब यांचे जुने संबंध आहेत. या भागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असा आमचा नेहमीच आग्रह राहिला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समस्त मराठी भाषिकांचे पुन्हा एकदा एकत्रीकरण झाले आहे. महाराष्ट्राला जोडले जाण्याच्या त्यांच्या इच्छेचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच शुभम शेळके यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बेळगावात येऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्याच्या प्रयत्नात असतात. दिल्लीला बरं वाटेल असे बोलण्याची आणि वागण्याची त्यांची पद्धत आहे. शिवाय मागची पाच वर्षे महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले आहे. आता आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल जी एक भावना असणे आवश्यक आहे, ती मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याकडे दिसायला हवी होती, पण ती दिसली नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी येथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात भूमिका घेणे टाळायला हवे होते, असेही पाटील म्हणाले. पत्रकार परिषदप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि प्रकाश मरगाळे उपस्थित होते.

तत्पूर्वी, एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला.

फोटो : समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित समितीचे नेते.