शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

फडणवीस ‘बोगस’ तर सदाभाऊ ‘भामटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:12 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक ...

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये रॅपीड प्रश्नावलीत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टÑवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल एका वाक्यात तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर ‘ फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे सडेतोड व रोखठोक उत्तर दिली. कॉँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे, घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘खात्म्या’साठी देव पाण्यात!शेतकºयांची वकिली सरकारच्या पातळीवर केल्याने अनेकजणांची अडचण झाली; त्यामुळेच माझा खात्मा करण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत; पण जोपर्यंत शेतकरी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत आपण बिनधास्त असल्याचेही ते म्हणाले.परवानगी द्या वजनकाटे उभे करूखासदार निधीतून गावागावांत वजनकाटे उभारण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेतली; पण स्थानिकची मिळ त नाही. मतदारसंघातच नव्हे राज्यात कोणीही काट्याची मागणी केली, तर तिथे काट्यासाठी निधी देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.आवाडेंना पाठिंबा देण्याचा प्रश्न नाहीघराणेशाहीविरोधात आपण आहोत, सदाभाऊंना ‘स्वाभिमानी’ खासगी कंपनी करायची होती, हे चालणार नाही, याच भूमिकेतून सागर खोतला विरोध केला. गेल्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात लढलो, मग जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडेंना पाठिंबा दिला कसा? हा आरोप चुकीचा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.शेट्टींना विचारलेलेप्रश्न, कंसात उत्तरेशेतकरी की लेखक (लेखक)दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच)कोणाची भीती वाटते(भीतीच नाही)राग आला तर (डोळे मिटतो)मनाला लागलेला आरोप(जमिनी घेतल्याचा)काय करायला नको होते (महायुती)शेतकºयांच्या घामापुढे राजकारण खड्ड्यात!ते म्हणाले, शेतकºयांसाठीच आम्ही राजकारणात सक्रीय आहोत, ‘हातकणंगले’ मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत, ‘एफआरपी’साठी त्या सगळ्यांना अंगावर घेतले आहे. राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी.