शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

फडणवीस ‘बोगस’ तर सदाभाऊ ‘भामटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:12 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक ...

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये रॅपीड प्रश्नावलीत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टÑवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल एका वाक्यात तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर ‘ फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे सडेतोड व रोखठोक उत्तर दिली. कॉँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे, घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘खात्म्या’साठी देव पाण्यात!शेतकºयांची वकिली सरकारच्या पातळीवर केल्याने अनेकजणांची अडचण झाली; त्यामुळेच माझा खात्मा करण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत; पण जोपर्यंत शेतकरी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत आपण बिनधास्त असल्याचेही ते म्हणाले.परवानगी द्या वजनकाटे उभे करूखासदार निधीतून गावागावांत वजनकाटे उभारण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेतली; पण स्थानिकची मिळ त नाही. मतदारसंघातच नव्हे राज्यात कोणीही काट्याची मागणी केली, तर तिथे काट्यासाठी निधी देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.आवाडेंना पाठिंबा देण्याचा प्रश्न नाहीघराणेशाहीविरोधात आपण आहोत, सदाभाऊंना ‘स्वाभिमानी’ खासगी कंपनी करायची होती, हे चालणार नाही, याच भूमिकेतून सागर खोतला विरोध केला. गेल्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात लढलो, मग जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडेंना पाठिंबा दिला कसा? हा आरोप चुकीचा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.शेट्टींना विचारलेलेप्रश्न, कंसात उत्तरेशेतकरी की लेखक (लेखक)दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच)कोणाची भीती वाटते(भीतीच नाही)राग आला तर (डोळे मिटतो)मनाला लागलेला आरोप(जमिनी घेतल्याचा)काय करायला नको होते (महायुती)शेतकºयांच्या घामापुढे राजकारण खड्ड्यात!ते म्हणाले, शेतकºयांसाठीच आम्ही राजकारणात सक्रीय आहोत, ‘हातकणंगले’ मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत, ‘एफआरपी’साठी त्या सगळ्यांना अंगावर घेतले आहे. राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी.