शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

कारखानदारांत होणार उसासाठी मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:00 IST

विभागात ४० लाख टन ऊस घटणार : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात सर्वाधिक फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दुष्काळ, अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागातील उसाचे उत्पादन किमान ४० लाख टनांनी घटण्याची शक्यता असून, ऊस मिळवून हंगाम यशस्वी करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये मारामारी होणार, हे नक्की आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार असून, गेल्या दहा वर्षांतील नीचांकी गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कधी नव्हे ती दुष्काळाची झळ यंदा कोल्हापूर जिल्ह्याला बसली. जानेवारीपासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण अवलंबल्याने ऊसपिकाला झटका बसला. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील ऊस पाण्याअभावी अक्षरश: करपून गेला. कसाबसा उभा ऊस तोडून कारखान्याला पाठविल्यानंतर हताश होऊन ऊस काढला आहे. सर्वाधिक उसाचे क्षेत्र या सहा तालुक्यांत असल्याने त्याचा परिणाम आगामी गळीत हंगामावर होणार आहे. दुष्काळातून काहीशा वाचलेल्या उसाला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: नदीकाठचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्याच्या उत्पादनात घट येणार आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्णात १ कोटी ४६ लाख ४ हजार टन, तर सांगली जिल्ह्णात ८० लाख १ हजार टन असे विभागात २ कोटी २६ लाख ९५ हजार टनांचे गाळप झाले होते. कारखान्यांचा हंगाम सहा महिने पूर्ण क्षमतेने चालला होता; पण आगामी हंगामात कारखानदारांची दमछाक होणार, हे नक्की आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सध्याचे उसाचे क्षेत्र पाहिले तर लागण ७१ हजार ३५३ हेक्टर, तर खोडवा ६१ हजार २७८ असे १ लाख ३२ हजार ६३१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्णाचा सरासरी उसाचा उतारा हेक्टरी ७९ टन गृहीत धरला तर १ कोटी ४ लाख ७७ हजार गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्णात ७२ हजार ३५८ हेक्टरवर ऊस आहे. येथील उसाचा सरासरी उतारा ८० टन गृहीत धरला तर ५१ लाख ८८ हजार टन गाळप होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्णांतील कारखान्यांना परजिल्ह्णांतून २५ लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतहंगामाची तुलना करता, किमान ४० लाख टन ऊस कारखान्यांना कमी पडण्याचा अंदाज आहे. सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच कंबर कसावी लागणार आहे.