शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांत होणार उसासाठी मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:00 IST

विभागात ४० लाख टन ऊस घटणार : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात सर्वाधिक फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दुष्काळ, अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागातील उसाचे उत्पादन किमान ४० लाख टनांनी घटण्याची शक्यता असून, ऊस मिळवून हंगाम यशस्वी करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये मारामारी होणार, हे नक्की आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार असून, गेल्या दहा वर्षांतील नीचांकी गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कधी नव्हे ती दुष्काळाची झळ यंदा कोल्हापूर जिल्ह्याला बसली. जानेवारीपासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण अवलंबल्याने ऊसपिकाला झटका बसला. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील ऊस पाण्याअभावी अक्षरश: करपून गेला. कसाबसा उभा ऊस तोडून कारखान्याला पाठविल्यानंतर हताश होऊन ऊस काढला आहे. सर्वाधिक उसाचे क्षेत्र या सहा तालुक्यांत असल्याने त्याचा परिणाम आगामी गळीत हंगामावर होणार आहे. दुष्काळातून काहीशा वाचलेल्या उसाला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: नदीकाठचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्याच्या उत्पादनात घट येणार आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्णात १ कोटी ४६ लाख ४ हजार टन, तर सांगली जिल्ह्णात ८० लाख १ हजार टन असे विभागात २ कोटी २६ लाख ९५ हजार टनांचे गाळप झाले होते. कारखान्यांचा हंगाम सहा महिने पूर्ण क्षमतेने चालला होता; पण आगामी हंगामात कारखानदारांची दमछाक होणार, हे नक्की आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सध्याचे उसाचे क्षेत्र पाहिले तर लागण ७१ हजार ३५३ हेक्टर, तर खोडवा ६१ हजार २७८ असे १ लाख ३२ हजार ६३१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्णाचा सरासरी उसाचा उतारा हेक्टरी ७९ टन गृहीत धरला तर १ कोटी ४ लाख ७७ हजार गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्णात ७२ हजार ३५८ हेक्टरवर ऊस आहे. येथील उसाचा सरासरी उतारा ८० टन गृहीत धरला तर ५१ लाख ८८ हजार टन गाळप होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्णांतील कारखान्यांना परजिल्ह्णांतून २५ लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतहंगामाची तुलना करता, किमान ४० लाख टन ऊस कारखान्यांना कमी पडण्याचा अंदाज आहे. सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच कंबर कसावी लागणार आहे.