शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कारखानदारांत होणार उसासाठी मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:00 IST

विभागात ४० लाख टन ऊस घटणार : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात सर्वाधिक फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दुष्काळ, अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागातील उसाचे उत्पादन किमान ४० लाख टनांनी घटण्याची शक्यता असून, ऊस मिळवून हंगाम यशस्वी करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये मारामारी होणार, हे नक्की आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार असून, गेल्या दहा वर्षांतील नीचांकी गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कधी नव्हे ती दुष्काळाची झळ यंदा कोल्हापूर जिल्ह्याला बसली. जानेवारीपासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण अवलंबल्याने ऊसपिकाला झटका बसला. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील ऊस पाण्याअभावी अक्षरश: करपून गेला. कसाबसा उभा ऊस तोडून कारखान्याला पाठविल्यानंतर हताश होऊन ऊस काढला आहे. सर्वाधिक उसाचे क्षेत्र या सहा तालुक्यांत असल्याने त्याचा परिणाम आगामी गळीत हंगामावर होणार आहे. दुष्काळातून काहीशा वाचलेल्या उसाला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: नदीकाठचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्याच्या उत्पादनात घट येणार आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्णात १ कोटी ४६ लाख ४ हजार टन, तर सांगली जिल्ह्णात ८० लाख १ हजार टन असे विभागात २ कोटी २६ लाख ९५ हजार टनांचे गाळप झाले होते. कारखान्यांचा हंगाम सहा महिने पूर्ण क्षमतेने चालला होता; पण आगामी हंगामात कारखानदारांची दमछाक होणार, हे नक्की आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सध्याचे उसाचे क्षेत्र पाहिले तर लागण ७१ हजार ३५३ हेक्टर, तर खोडवा ६१ हजार २७८ असे १ लाख ३२ हजार ६३१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्णाचा सरासरी उसाचा उतारा हेक्टरी ७९ टन गृहीत धरला तर १ कोटी ४ लाख ७७ हजार गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्णात ७२ हजार ३५८ हेक्टरवर ऊस आहे. येथील उसाचा सरासरी उतारा ८० टन गृहीत धरला तर ५१ लाख ८८ हजार टन गाळप होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्णांतील कारखान्यांना परजिल्ह्णांतून २५ लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतहंगामाची तुलना करता, किमान ४० लाख टन ऊस कारखान्यांना कमी पडण्याचा अंदाज आहे. सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच कंबर कसावी लागणार आहे.