शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

सोलापुरातील कारखाने सुरू मग कोल्हापुरातच बंद का?

By admin | Updated: November 5, 2015 00:39 IST

ऊस हंगामाची कोंडी : संघटना व कारखानदार आपल्या भूमिकांवर ठाम; पण शेतकरी अस्वस्थ

कोल्हापूर : गत हंगामातील ‘एफआरपी’ न देता सोलापूर जिल्ह्यातील १८ साखर कारखाने सुरू आहेत; पण पूर्ण ‘एफआरपी’ देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी अद्याप थंड कशी? अशी विचारणा आता होऊ लागली आहे. ऐन गळीत हंगामात शेतकरी संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत; पण दिवसेंदिवस शेतकरी मात्र अस्वस्थ होऊ लागला आहे. एकरकमी एफआरपी पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटना ठाम आहे, तर साखरेचे दर पाहता ती देणे शक्य नसल्याचे सांगत साखर कारखानदार थंड आहेत. गत हंगामात शेतकरी संघटना ‘एफआरपी’प्रमाणे दर द्या, अशी भूमिका घेत कागदावरची लढाई केली होती. त्यामुळे बहुतांश कारखाने १ नोव्हेंबरला सुरू झाले; पण या हंगामात शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीचा मुद्दा पुढे करीत आक्रमक भूमिका घेतल्याने पेच तयार झाला आहे. गत हंगामात कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी टप्प्याटप्प्यानेच ‘एफआरपी’ दिली होती. सोलापूर जिल्ह्यातील केवळ पांडुरंग साखर कारखान्याने पूर्ण एफआरपी अदा केली आहे. तिथे तब्बल १८ साखर कारखाने जोमात सुरू आहेत; पण कोल्हापुरातील सर्वच कारखान्यांनी एफआरपी दिली असताना येथील कारखाने बंद कसे? अशी विचारणा होऊ लागली आहे. कारखानदारांनी शेतकरी संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गाळप हंगाम जेवढा लांबविता येईल, तेवढा लांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांबरोबर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एकरकमी एफआरपीचा गुंता वाढविण्याची रणनीती आखली आहे. या सर्व खेळात शेतकरी मात्र पुरता अडचणीत आला आहे, हे मात्र निश्चित आहे. हंगाम लांबल्यास कारखान्यांची पाळीपत्रके विस्कळीत होणार असून, मार्च-एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहिले, तर पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाऐवजी वाळलेली खोडवीच तोडून घालावी लागणार आहेत. विहिरीवरील उसाची पिके डिसेंबरनंतरच अडचणीत येणार आहेत. भूजल पातळी खालावल्याने जानेवारी महिन्यातच विहिरी तळ गाठणार आहेत. (प्रतिनिधी)हंगाम वाढल्याने शेतकरीच गोत्यातहंगाम लांबल्याने साखर कारखानदारांचा तोटा होत नाही. उसाची तोड लांबली तर साखर उतारा वाढतो; पण उसाचे वजन घटते.यंदातर पाण्याअभावी अधीच अडचणीत आलेला शेतकरी हंगाम लांबल्याने अधिकच गोत्यात येणार आहे.आयुक्त कार्यालयाची बघ्याची भूमिकादुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वास्तविक साखर आयुक्तांनी हस्तक्षेप करीत कारखान्यांना गाळप लवकर सुरू करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते; पण आम्ही परवाना दिला ना, मग हंगाम सुरू करण्याची जबाबदारी कारखान्यांची, असे हात झटकल्याने हा पेच तयार झाला आहे.