शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

आजऱ्यातील उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी ...

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी दिल्या. शिवसेनेच्या वतीने आजरा तालुक्यातील शिल्लक ऊस व टोळी मुकादमाकडून होणारी अडवणूक याबाबत आजरा तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात सर्व कारखान्यांचे कार्यालय प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. तालुक्यातील शिल्लक ऊस गाळपासाठी नेण्यासाठी तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुद्द तोड करून ऊस दिल्यास वाहनांची व्यवस्था केली जाईल, अशी भूमिका कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी मांडली. १५ ते २० मार्चदरम्यान कारखाने बंद होणार आहेत. त्या अगोदर तालुक्यातील ऊस प्राधान्याने तोडला जाईल. ऊस टोळ्यांना शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. मागणी केल्यास कारखाना प्रशासनाला कळवा. त्यांच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाची तीव्रता वाढली आहे. शिरसंगी व भादवण येथील उसाला आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस तुटत नाही तोपर्यंत कारखाना बंद करू नका, असेही तहसीलदार अहिर यांनी सांगितले. ऊस घेऊन जाताना वाट अडविण्याचे प्रकार झाल्यास तातडीने कळवा, असे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.

बैठकीला शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, कृष्णा पाटील, शंकर संकपाळ यांच्यासह तांबाळे, संताजी घोरपडे, हेमरस, बेडकिहाळ, गडहिंग्लज कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.