शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आजऱ्यातील उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी ...

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी दिल्या. शिवसेनेच्या वतीने आजरा तालुक्यातील शिल्लक ऊस व टोळी मुकादमाकडून होणारी अडवणूक याबाबत आजरा तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात सर्व कारखान्यांचे कार्यालय प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. तालुक्यातील शिल्लक ऊस गाळपासाठी नेण्यासाठी तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुद्द तोड करून ऊस दिल्यास वाहनांची व्यवस्था केली जाईल, अशी भूमिका कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी मांडली. १५ ते २० मार्चदरम्यान कारखाने बंद होणार आहेत. त्या अगोदर तालुक्यातील ऊस प्राधान्याने तोडला जाईल. ऊस टोळ्यांना शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. मागणी केल्यास कारखाना प्रशासनाला कळवा. त्यांच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाची तीव्रता वाढली आहे. शिरसंगी व भादवण येथील उसाला आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस तुटत नाही तोपर्यंत कारखाना बंद करू नका, असेही तहसीलदार अहिर यांनी सांगितले. ऊस घेऊन जाताना वाट अडविण्याचे प्रकार झाल्यास तातडीने कळवा, असे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.

बैठकीला शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, कृष्णा पाटील, शंकर संकपाळ यांच्यासह तांबाळे, संताजी घोरपडे, हेमरस, बेडकिहाळ, गडहिंग्लज कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.