शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

आजऱ्यातील उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी ...

आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी दिल्या. शिवसेनेच्या वतीने आजरा तालुक्यातील शिल्लक ऊस व टोळी मुकादमाकडून होणारी अडवणूक याबाबत आजरा तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात सर्व कारखान्यांचे कार्यालय प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. तालुक्यातील शिल्लक ऊस गाळपासाठी नेण्यासाठी तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुद्द तोड करून ऊस दिल्यास वाहनांची व्यवस्था केली जाईल, अशी भूमिका कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी मांडली. १५ ते २० मार्चदरम्यान कारखाने बंद होणार आहेत. त्या अगोदर तालुक्यातील ऊस प्राधान्याने तोडला जाईल. ऊस टोळ्यांना शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. मागणी केल्यास कारखाना प्रशासनाला कळवा. त्यांच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाची तीव्रता वाढली आहे. शिरसंगी व भादवण येथील उसाला आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस तुटत नाही तोपर्यंत कारखाना बंद करू नका, असेही तहसीलदार अहिर यांनी सांगितले. ऊस घेऊन जाताना वाट अडविण्याचे प्रकार झाल्यास तातडीने कळवा, असे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.

बैठकीला शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, कृष्णा पाटील, शंकर संकपाळ यांच्यासह तांबाळे, संताजी घोरपडे, हेमरस, बेडकिहाळ, गडहिंग्लज कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.