शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

पर्यटकांतून नाराजी : ग्रामपंचायतीसह सर्वच शासकीय विभागांचे दुर्लक्ष; स्वच्छतागृह, पाणपोईची सोय नाही

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा --हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, विश्वगौरव विभूषित प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या तप साधनेने पुनीत झालेली आणि हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्यांची जहाँगीर म्हणून आपला इतिहास चिरंतन ठेवणारा ‘गगनबावडा’ हे नाव खूप मोठे असले तरी गाव छोटे आहे.ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या असंख्य पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. किल्ले गगनगड, कुंभी मध्यम प्रकल्प, पाचव्या शतकातील सांगशी शिलालेख, मोरजाई देवीचे पठार, पळसंबे येथील पांडवकालीन लेणी, वेसरफ, अणदूर व कोदे येथील धरणे, वेतवडे येथील कुंभी-सरस्वतीचा संगम, करूळ व भुईबावडा घाटरस्ते, किल्ले गगनगड या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय होत असून, गगनबावडा गावात कुठून जायचे, कसे, असा प्रश्न विचारावा लागतो हे दुर्दैव आहे. गगनबावडा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दहा वर्षांत एकदाही खड्ड्यांना मुलामा द्यावा, असा विचार करावासा वाटला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. शेकडो वाहनधारक ज्या चौकात आपली वाहने थांबवून विसावा घेण्याबरोबरच स्थानिक तरुणांच्या अर्थप्राप्तीसाठी हातभार लावतात, हा चौक राजकीयदृष्टीने विविध संघटनांची मालकी असणारे ठिकाण बनला आहे. मात्र, आजूबाजूला असणारे खड्डे, कचरा, दगडधोंडे आणि धुळीच्या साम्राज्यापासून समस्यांकडे सर्वांनीच सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.गटातटाच्या राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अधिकारांचा वापर प्राधान्याने विकासकामांसाठी करणे अपेक्षित आहे. येथील ग्रामपंचायतीने येथील संस्थांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दीसाळवण : आकाशाला गवसणी घालणारे व हिरवाईने बहरलेले डोंगरमाथे, धुक्यांच्या लपंडावात रंगलेली पर्वतश्रेणी, त्यातून फेसाळत झेपावणारे शुभ्र झरे आणि अधूनमधून कोसळणाऱ्या सरी असे मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण गगनबावड्यात सर्वत्र रुंजी घालत असून, याचा आस्वाद घेत चिंब भिजण्यासाठी गगनबावडा पर्यटकांना साद घालतो आहे.कोल्हापुरातन कोकणाकडे जाणारा प्रमुख घाट मार्ग म्हणजे करूळघाट. याची सुरुवात गगनबावड्यातून होते. प्रती महाबळेश्वर आणि महाराष्ट्राची चेरापुंजी अशीच याची ख्याती आहे. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद येथेच होते. यामुळे पावसाळ्यात जणू येथे स्वर्गच अवतरतो. निसर्गाच्या मुक्त उधळणीने दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. त्यात दिसणारे स्वच्छ, सुंदर कोकण, अनेक कड्यांवरून कोसळणारे धबधबे, काही रस्त्याजवळ तर काही दूर पर्वतांच्या अंगा-खांद्यावरून फेसाळत दरीत लुप्त होणारे, असे विहंगम दृश्य टिपण्यासाठी गगनबावड्यातून यु वळणावर येताच पर्यटकांचे पाय थबकतात आणि मन प्रफुल्लित होते.गेले काही दिवस कोसळणाऱ्या धो-धो पावसाने घाटाचे रूपच पालटले असून, सर्वत्र हिरवागार शालू पांघरल्याचा भास होतो. हवेत तरंगणाऱ्या धुक्यांची दुलई, सोसाट्याचा वारा, टपोरा आणि मधूनच कोसळणारा धो-धो पाऊस या साऱ्या गोष्टी मनाला आल्हाददायक आहेत, तर घाटातून दिसणारे गगनगडाचे दृश्य सर्वांच्यावर अमृताचे शिंपण करीत उभे आहे. त्यामुळे येणारा पर्यटक येथे नतमस्तक होतो. भिरभिरणाऱ्या वाऱ्यात पळणारी धुकं, त्यांचा स्पर्श मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो.