शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

घरांसह शेतीचे नुकसान पाहून डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : तब्बल आठ दिवसांनी शहरातील पुराचे पाणी ओसरताच शहरवासीय परतत आहेत. त्यामुळे शहर पूर्वपदावर येत ...

गणपती कोळी

कुरुंदवाड :

तब्बल आठ दिवसांनी शहरातील पुराचे पाणी ओसरताच शहरवासीय परतत आहेत. त्यामुळे शहर पूर्वपदावर येत असले तरी घरांसह शेतीचे झालेले नुकसान पाहून पूरग्रस्तांचे डोळे पाणावत आहेत. नुकसानीचा पंचनामा केला जात असला तरी मिळणारी भरपाई तुटपुंजी असल्याने भरपाईपेक्षा पुराचे संकट ओढावू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

२०१९ चे महापूर, कोरोना संकटातून सावरत असताना पुन्हा आलेल्या महापुराने शहराची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कृष्णा, पंचगंगा नदीने शहराला वेढा दिल्याने शहराला बेटाचे स्वरूप आले होते. राजवाडा परिसर आणि माळभागातील काही भाग वगळता संपूर्ण शहर पाण्यात होते. संभाव्य महापुराचा धोका ओळखून नागरिकांनी जनावरांसह वेळीच स्थलांतर झाल्याने जीवितहानी टळली असली तरी न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहरातील सुमारे ४६०० घरांत पुराचे पाणी आले होते. त्यातील २६०० घरे पूर्णपणे बुडाली होती. शहराची संपूर्ण शेती (१७०० हेक्टर) अनेक दिवस पाण्यात राहिल्याने सोयाबीन, भात, भुईमूग, भाजीपाला तर कुजुन गेला आहे. शिवाय ऊस पीकही धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतीसह घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी, हाताला काम नसल्याने मजूर वर्ग तर दुकानदार छोटे-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसानीमुळे सर्वच घटकांना महापुराचा फटका बसला आहे.

पूर ओसरताच स्थलांतरित झालेले नागरिक परतले असून घरांचे, शेतीचे नुकसान पाहून डोळे पाणावत आहेत. मात्र काळजावर दगड ठेवून आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत सावरत आहेत. पालिका प्रशासन, महसूल विभाग पंचनामा करत असले तरी मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजीच असल्याने पुराचे इतके गंभीर संकट ओढवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

पुराच्या पाण्याने शहरातील ऐंशी टक्के भाग पाण्यात होता. राजवाडा व माळभागातील मोजकाच भाग उंचावर असल्याने पाण्यापासून वाचला होता मात्र या नागरिकांनाही नुकसानीचा फटका बसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत पूरग्रस्त नागरिकांना निवारा, जेवण, आर्थिक मदतीचा हात देत माणुसकी दाखविली त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.

कोट...

शहराच्या चारही बाजूंनी पुराचे पाणी आल्याने शहराला बेटाचे स्वरूप आले होते. शहरातील मोजकाच भाग पाण्यापासून वाचला असला तरी या भागातील नागरिकांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निकषाप्रमाणे संपूर्ण शहर पूरग्रस्त जाहीर करावे.

दादासो पाटील

माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड

फोटो

०१ कुरुंदवाड

फोटो - कुरुंदवाड शहरातील पुराचे पाणी ओसरताच घर दुकाने स्वछ करण्यात घरचे संपूर्ण कुटुंब मग्न आहेत.