शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कागलकरांचे डोळे पाणावले

By admin | Updated: April 18, 2015 00:04 IST

राजेंच्या अस्थिकलश दर्शनास गर्दी : कागल, मुरगूडमध्ये भावुक वातावरण

कागल : ज्येष्ठ नेते आणि कागल शहराचे भूतपूर्व संस्थानिक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी शुक्रवारी कागलकरांनी भावपूर्ण वातावरणात गर्दी केली होती. राजेंचा अस्थिकलश पाहून अनेक महिला अश्रू रोखू शकल्या नाहीत. मुख्य मार्गावरून भजनी मंडळाच्या निनादात आणि ‘अमर रहे, अमर रहे, राजेसाहेब अमर रहे’, राजेसाहेब परत या...’ अशा घोषणा देत ही अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. येथील दूधगंगा नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले.विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कागलला आणावे, अशी कागलवासीयांची इच्छा होती. मात्र, मुळातच विक्रमसिंहराजेंना जिवंतपणी हे असले प्रकार आवडत नसल्याने त्यांच्या घरच्या लोकांनी या गोष्टीस नकार दिला. शुक्रवारी त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन तरी घ्यावे, या भावनेने येथील बसस्थानक चौकात अलोट गर्दी झाली होती. कोल्हापूरहून हा अस्थिकलश शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयात आणला. तेथून सजविलेल्या जीपमध्ये ठेवून बसस्थानक चौक, खर्डेकर चौक मार्गे गैबी चौकात काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, नगराध्यक्षा आशाकाकी माने, भैया माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, बॉबी माने, विवेक कुलकर्णी, आदी उपस्थित होते. मुरगूडमध्येही मोठी गर्दीमुरगूडमध्ये अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सर्वस्तरातील हजारो कार्यकर्ते, महिलांनी गर्दी केली होती. मुरगूड शहरातून अस्थिकलश नेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास वेदगंगा नदीमध्ये अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. सकाळी नऊच्या सुमारास निपाणी-मुरगूड रस्त्यावरील नाका नं. १ जवळ अस्थिकलशाचे आगमन झाले. प्रारंभी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख, नगराध्यक्षा वसुधा कुंभार यांच्या हस्ते अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दत्तमंदिर येथील नदीघाटावर विलासराव गुरव, रामभाऊ खराडे, सुरेश सूर्यवंशी, पांडुरंग वंदुरे, नामदेव खतकर या पाच वारकऱ्यांच्या हस्ते या अस्थिकलशाचे वेदगंगा नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. ( प्रतिनिधी )राममंदिराचे स्वप्नराममंदिराजवळ मिरवणूक थांबली. बसस्थानकापासून अस्थिकलश मिरवणुकीने गैबी चौकाकडे जात असताना जीर्णोद्धाराचे काम सुरू असलेल्या श्रीराम मंदिराजवळ काही काळासाठी ही मिरवणूक थांबविण्यात आली. कागलमध्ये भव्य असे राममंदिर बांधण्याचे राजेंचे स्वप्न होते. ते या जीर्णाेद्धार समितीचे प्रमुख होते. या आठवणींनी अनेकांचे डोळे पाण्यांनी डबडबले.