शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

दोन्ही एमआयडीसी वगळून हद्दवाढ

By admin | Updated: February 17, 2016 01:15 IST

प्रस्ताव शासनाकडे : आराखडा तयार करण्यासाठी लोकसंख्येचा आधार : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यकच असल्याच्या अभिप्रायासह अहवाल मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी राज्य शासनाकडे पाठविला. या अभिप्रायामध्ये शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींना (एमआयडीसी)वगळण्यात यावे, असे मत व्यक्त केले आहे, तर लोकसंख्येवर आधारित हद्दवाढीचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती डॉ. सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सतरा गावांचा समावेश असणारा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वी शासनाकडे पाठविला आहे पण या प्रस्तावामध्ये शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्यात यावा, असे मत महापालिकेने मांडले होते. बहुतांशी लोकप्रतिनिधींचा हद्दवाढीला विरोध आहे, पण हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास अशक्य आहे. केंद्र सरकारच्या काही योजनांत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी आवश्यक लोकसंख्या सध्या नाही. त्यामुळे ही लोकसंख्या वाढविण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे शहराचा विस्तार व विकास हा उभा वाढलेला आहे, तो आडवा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त करत हद्दवाढीचा प्रस्ताव मंगळवारी सायंकाळी राज्य शासनाकडे सादर केल्याचे सांगितले. याबाबत माहिती देताना डॉ. सैनी म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासनाने आपल्याकडे वस्तुनिष्ठ अभिप्रायासह अहवाल मागितला होता, त्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हेही उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांचेही मत या पाठविलेल्या अभिप्रायामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व नागरीकीकरण होणे ही काळाची गरज आहे, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करताना भौगोलिक संलग्नता ग्राह्य धरली आहे. त्यानुसार लोकसंख्येवर आधारित हद्दवाढीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हद्दवाढीचा राज्य शासनाने निर्णय घेतल्यास त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासन निधी देणार नाही, त्या ग्रामपंचायतींना महापालिकेमार्फत दत्तक घेऊनच त्यांचा विकास करावा लागणार आहे. या विकासामध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या जातील, अवजड वाहनांना बाहेरच्या बाहेर रस्ता काढून मार्गस्थ केले जाईल, त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, असेही डॉ. सैनी म्हणाले. (प्रतिनिधी)गांधीनगरसह किती गावांचा समावेश ?राज्य शासनाला पाठविलेल्या हद्दवाढीच्या अभिप्रायाच्या अहवालात किती गावांचा समावेश, गांधीनगर गावचा समावेश असल्याबाबत मात्र डॉ. सैनी यांनी माहिती देण्यास नकार दिला; पण दोन्हीही औद्योगिक वसाहती वगळून हद्दवाढ करण्यास हरकत नसल्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.