शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

हद्दवाढ अपरिहार्यच; प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्या

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

मुंबईत बैठक : महापालिका आयुक्त बिदरी यांची प्रधान सचिवांकडे विनंती; ठोस निर्णय नाही

कोल्हापूर : शहराचा आणि शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास करायचा असेल, तर हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे. तेव्हा हद्दवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, गुरुवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे केली. आज मुंबईत झालेल्या बैठकीत कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीच्या प्रस्तावाची विस्तृत माहिती श्रीकांत सिंह यांना करून दिली.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ हा सध्या शहर परिसरातील गाजत असलेला विषय आहे. महानगरपालिका प्रशासनाने हद्दवाढ करावी म्हणून आग्रह धरला आहे, तर ज्या सतरा गावांचा समावेश अपेक्षित आहे, त्या गावांतील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यातच उच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे महापालिकेबरोबरच हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या १७ गावांतील लोकांचे लक्ष लागून राहिले होते. हद्दवाढीला असलेल्या विरोधाची श्रीकांत सिंह यांना माहिती आहे. त्यामुळे महापालिकेची काय भूमिका आहे, प्रस्तावित गावांच्या लोकसंख्येची घनता, दरडोई उत्पन्न, आदी माहिती त्यांनी करून घेतली; परंतु कोणताही ठोस निर्णय यावेळी झाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीचा निर्णय होण्याबाबत संदिग्धता आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक एम. डी. राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)