शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सहायक ‘बीडीओं’ची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:00 IST

आजरा पंचायत समिती सभा : सभापतींची कारवाई; कामचुकारपणाचा आरोप

आजरा : पगार सरकारचा घ्यायचा आणि कामे घरची करायची, कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना केवळ घरभाडे आणि पगारापुरते कामावर यायचे, असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असे संतापजनक उद्गार काढत आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर यांनी सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांना चक्क सभागृहातून हाकलून तर लावलेच, त्याचबरोबर जोपर्यंत भोसले आजरा येथे राहत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पगार व घरभाडे न काढण्याचा ठरावही केला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीसच पंचायत विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली. धड विस्तार अधिकारी नाही आणि वारंवार सूचना करूनही सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. मुळातच भोसले हे कामावरच हजर नसतात, असा आरोप सभापती केसरकर यांनी करत कामे कुणी करायची? आम्ही केवळ सहीपुरतेच आहोत का? असे असेल तर कारभार अधिकाऱ्यांनीच चालवावा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. यावरून सहायक गटविकास अधिकारी भोसले व सभापती केसरकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. भोसले यांचा आवाज वाढताच त्यांना सभापतींनी आपण सभागृहात बसायचे नाही. तातडीने चालते व्हा, असे सुनावले. सभापतींचा आवेश बघून सारे सभागृह स्तब्ध झाले. भोसले सभागृहाबाहेर निघून गेले.त्यानंतर सभेमध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. एस. टी. आगाराकडून काही गाड्या ऐनवेळी रद्द केल्या जातात. अशावेळी प्रवाशांनी काय करायचे? असा प्रश्न दीपक देसाई यांनी केला. देवकांडगावला मुक्कामासाठी जाणारी गाडी रिकामी जात असेल तर एस. टी. आगार नफ्यात कसे येईल? असा उपरोधिक सवालही केला.जलसंधारण विभागाने चुकीच्या पद्धतीने सोहाळे बंधाऱ्यावर पाणी अडवण्यासाठी बरगे घातले आहेत. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेलेच आहेत, पण त्याचबरोबर जलसंधारणच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावात पाणीटंचाई उद्भवणार आहे. बंधाऱ्याची गळती काढण्याचे काम व बरगे टाकणे याची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे तपासून चौकशीचा ठराव करण्यात आला.शाळांसह पडक्या अवस्थेत असणाऱ्या इमारतींचे निर्लेखनाचे प्रस्ताव वेळेत पाठवले जात नसल्याबद्दल सभापती केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.सदस्या निर्मला व्हनबट्टे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात करण्यात आलेल्या शेतीपिकांना नुकसानभरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सभेमध्ये पाटबंधारे, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, तालुका कृषी विभाग, शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला.सभेस अनिता नाईक, तुळशीराम कांबळे, कामिना पाटील, आदी उपस्थित होते. उपसभापती दीपक देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)३0 रोजी वरिष्ठ समिती येणार आजरा तालुक्यातील संपूर्ण ७४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.याबाबतची वरिष्ठ समिती ३० तारखेला तालुक्याला भेट देणार असल्याचे गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी स्पष्ट केले. उचंगी येथील प्रकल्पग्रस्तांना गट नंबर दाखविण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पंचायत समितीच्या नूतन इमारतीत दोन वर्षांपासून कामकाज सुरू आहे. ६५ लाखांच्या फर्निचरचा प्रस्ताव आहे. फर्निचर जुनेच वापरले जात आहे. नवीन फर्निचर कधी येणार, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.स्वच्छतागृह फोडून टाकूइमारत बांधकाम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य नूतन इमारतीमधील स्वच्छतागृहास वापरले आहे, ते बादही झाले आहे. दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला कल्पना देऊनही दुरुस्ती होत नाही. आता दगड टाकून स्वच्छतागृहातली भांडी फोडून टाकू, असे सभापती केसरकर यांनी सुनावले.