शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

अतिरिक्त ‘सर’ बेघर!

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

५९ शिक्षण संस्थांनी नाकारले : ११५ जण ‘ना घर का ना घाट का’

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -सन २०१३ च्या पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकांना(सरांना) जिल्ह्यातील ५९ शिक्षण संस्थांनी माध्यमिक शिक्षण विभागाने हजर करून घेण्याच्या काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. वांरवार हेलपाटे मारूनही रुजू करून घेतलेले नाही. परिणामी अतिरिक्त अशा ११५ शिक्षकांची अवस्था ‘ना घर का ना घाटका’ अशी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार समायोजन करून न घेणाऱ्या संस्थांवर कारवाई होऊ शकते; परंतु कारवाईचे धाडस शिक्षण विभागाने अजूनतरी दाखविलेले नाही.मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्यानुसार पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जात आहे. ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येनुसार जिल्ह्यात बीएड झालेले ७ हजार ६६९ तर डीएडचे १ हजार ५१० असे एकूण ९ हजार १७९ शिक्षकांची पदे मंजूर झाली. डीएडचे ९३९ तर ३६ बीएडचे शिक्षक अतिरिक्त ठरले. यातील ८६० शिक्षकांचे तालुका आणि संस्थास्तरावर रिक्त जागी समायोजन झाले. ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले. शिक्षण प्रशासनाने संस्थानिहाय रिक्त जागांची यादी तयार केली आहे. त्यानुसार रिक्त जागेवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. अतिरिक्त शिक्षकांना रिक्त असलेल्या संस्थेत रूजू होण्याचा आदेश दिला जात आहे. संबंधित शिक्षक आदेश घेऊन संस्थेच्या शाळेत गेल्यानंंतर तांत्रिक कारणे सांगून परत कसा जाईल हे पहात आहेत. रिक्त जागेवर अतिरिक्त शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार संस्था चालकांना सामावून घ्यावे लागणार आहे. अन्यथा कारवाई होणार आहे. - ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, माध्यमिकडोनेशन मुख्य अडचण...नव्याने शिक्षक भरती शासनाने बंद केली आहे. बंदी उठविल्यानंतर सेवेत घेण्यासाठी ‘आपल्या’उमेदवारांकडून डोनेशन घेऊन बुकिंग केले आहे. अतिरिक्त शिक्षकांना सामायोजन करून घेतल्यास बुकिंग केलेल्या उमेदवाराचे पैसे संबंधित संस्थेला परत करावे लागणार आहे. परिणामी संस्थेला डोनशनवर पाणी सोडावे लागणार आहे. रूजू करून न घेण्याचे हेच मुख्य कारण आहे.