शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवरणपत्र निर्धारणास वर्षाची मुदतवाढ

By admin | Updated: April 2, 2016 00:56 IST

महापालिकेला दिलासा : एलबीटीप्रश्नी शासनाचा आदेश

 सांगली : ‘एलबीटी’पोटी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे सादर केलेल्या विवरणपत्रांचे अंतिम निर्धारण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीमुळे सांगलीसह एलबीटी लागू असलेल्या सर्व महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात ११ हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. एलबीटीअंतर्गत सुमारे ३३०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली नाही. दोन वर्षांत ५६०० व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला होता. २०१३-१४ या वर्षात ४७३०, तर २०१४-१५ या वर्षात ३७०० व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले. या विवरणपत्रांच्या तपासणीसाठी पालिकेने के. के. चलानी आणि कंपनी, मुंबई, राजेश भाटे व बुकटे या तीन कर सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या कर सल्लागारांकडून दाखल विवरणपत्रांची तपासणी करून अंतिम मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी मार्चपर्यंत ५० कोटींचे टार्गेट दिले आहे. कर सल्लागारांकडून आतापर्यंत ६०० विवरणपत्रांची छाननी झाली आहे. आतापर्यंत विवरणपत्र सादर न करणाऱ्या ८६० व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. छाननी झालेल्यांपैकी ५४ विवरणपत्रांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे, तर आठ व्यापाऱ्यांच्या विवरणपत्रांचे मूल्यांकन निश्चित करून त्यांना नोटीस बजावण्यासाठी आयुक्तांची मान्यता घेतली जात आहे. ही फाईल आयुक्तांकडे प्रलंबित आहे. विवरपत्रांचे निर्धारण निश्चित करण्यासाठी पूर्वी शासनाने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत काम पूर्ण होणार नसल्याने १५ दिवसांपूर्वी महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यातच शुक्रवारी शासनाने एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे सांगलीसह राज्यातील एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांच्या लुटीची आणखी संधी : अतुल शहाराज्य शासनाने एलबीटी विवरणपत्र निर्धारणास मुदतवाढ देऊन व्यापाऱ्यांना लुटण्याची एक वर्षाची संधी महापालिकांना दिली असल्याची टीका महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी केली. ते म्हणाले की, एलबीटीत अनेक महापालिकांनी जकातीपेक्षा जादा उत्पन्न मिळविले आहे. तरीही विवरणपत्रांवरून व्यापाऱ्यांना पालिकेकडून त्रास सुरू आहे. सांगलीसह काही पालिकांचे उत्पन्न ५० टक्केही होऊ शकले नाही. याला व्यापारी जबाबदार नाहीत. आता मुदतवाढीमुळे पुन्हा व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जाईल, असेही शहा म्हणाले.