शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विवरणपत्र निर्धारणास वर्षाची मुदतवाढ

By admin | Updated: April 2, 2016 00:56 IST

महापालिकेला दिलासा : एलबीटीप्रश्नी शासनाचा आदेश

 सांगली : ‘एलबीटी’पोटी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे सादर केलेल्या विवरणपत्रांचे अंतिम निर्धारण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीमुळे सांगलीसह एलबीटी लागू असलेल्या सर्व महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात ११ हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. एलबीटीअंतर्गत सुमारे ३३०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली नाही. दोन वर्षांत ५६०० व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला होता. २०१३-१४ या वर्षात ४७३०, तर २०१४-१५ या वर्षात ३७०० व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले. या विवरणपत्रांच्या तपासणीसाठी पालिकेने के. के. चलानी आणि कंपनी, मुंबई, राजेश भाटे व बुकटे या तीन कर सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या कर सल्लागारांकडून दाखल विवरणपत्रांची तपासणी करून अंतिम मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी मार्चपर्यंत ५० कोटींचे टार्गेट दिले आहे. कर सल्लागारांकडून आतापर्यंत ६०० विवरणपत्रांची छाननी झाली आहे. आतापर्यंत विवरणपत्र सादर न करणाऱ्या ८६० व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. छाननी झालेल्यांपैकी ५४ विवरणपत्रांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे, तर आठ व्यापाऱ्यांच्या विवरणपत्रांचे मूल्यांकन निश्चित करून त्यांना नोटीस बजावण्यासाठी आयुक्तांची मान्यता घेतली जात आहे. ही फाईल आयुक्तांकडे प्रलंबित आहे. विवरपत्रांचे निर्धारण निश्चित करण्यासाठी पूर्वी शासनाने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत काम पूर्ण होणार नसल्याने १५ दिवसांपूर्वी महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यातच शुक्रवारी शासनाने एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे सांगलीसह राज्यातील एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांच्या लुटीची आणखी संधी : अतुल शहाराज्य शासनाने एलबीटी विवरणपत्र निर्धारणास मुदतवाढ देऊन व्यापाऱ्यांना लुटण्याची एक वर्षाची संधी महापालिकांना दिली असल्याची टीका महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी केली. ते म्हणाले की, एलबीटीत अनेक महापालिकांनी जकातीपेक्षा जादा उत्पन्न मिळविले आहे. तरीही विवरणपत्रांवरून व्यापाऱ्यांना पालिकेकडून त्रास सुरू आहे. सांगलीसह काही पालिकांचे उत्पन्न ५० टक्केही होऊ शकले नाही. याला व्यापारी जबाबदार नाहीत. आता मुदतवाढीमुळे पुन्हा व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जाईल, असेही शहा म्हणाले.