शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल सहापदरीच्या निविदेला १२ वेळा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:56 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे ते बंगलोरराष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या १३३ किलोमीटर लांबीच्या ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुणे ते बंगलोरराष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या १३३ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काम रखडले आहे. गेल्या दीड वर्षांत निविदेला १२ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी ‘निविदा-पे- निविदा’ अशी स्थिती झाली आहे. मुदतवाढ दिलेली निविदा आता दि. ४ जानेवारीला उघडण्याचे जाहीर केले असले तरीही परिस्थिती पाहता निविदेला पुन्हा मुदतवाढच मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचएआय) यांच्यातील अंतर्गत वादामुळे टोल वसुलीच्या मुद्द्यावरून या निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याचे काम मंत्रालय पातळीवरून होत आहे.पुणे ते बंगलोरया राष्ट्रीय महामार्गाचे दुपरीकरणाचे काम २००२ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील करारानुसार चौपदरीकरणाचे नियोजन झाले. त्याचवेळी चारपदरी व सहापदरी रस्त्यासाठी ६० मीटर रुंदीची जमीन राष्टÑीय महामार्ग विभागाने अधिगृहण केली, तर राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २००५पर्यंत चौपदरीकरण केले. ‘बीओटी’ तत्त्वावर काम केल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाला या रस्त्यावर २०२२ पर्यंत टोलवसुली करण्याची मुदत दिली. त्याचवेळी किणी आणि तासवडे या दोन टोलनाक्यांचा उदय झाला.महाराष्ट्रातील रस्त्याची मालकी ही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे २०१४ या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केले; पण कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दर्जाबाबत तुलना झाली. त्यामुळे पुणे-सातारा सहापदरीकरण टीकेचे लक्ष बनल्याने पुढील सातारा ते कागलपर्यंतचे सहापदरीकरण रखडले. या कामाची निविदा वारंवार प्रसिद्ध झाली, प्रतिसादही मिळाला पण मंत्रालयस्तरावर निविदा खुल्या करण्यासाठी ‘खो’ मिळतआहे.टोलवसुली करायची कोणी?महाराष्ट्रातील दुपदरी व चारपदरी रस्ता हा राज्य रस्ते विकास महामंडळाने केला, त्या बदल्यात त्यांना २०२२ पर्यंत टोल आकारणी करता येणार आहे. हा रस्ता सहापदरीकरणाची करण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली. पण, पुणे ते सातारा रस्ता हा सहापदरीकरण राष्टÑीय महामार्ग विभागामार्फत केला. आता सातारा ते कागलपर्यंत हा रस्ता तातडीने सहापदरीकरण पूर्ण केल्यास टोलची वसुली कोणी करायची? हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्यासाठी ‘निविदा-पे- निविदा’ असे लालफितीत भिजत घोंगडे अडकले. या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम २०१९च्या अखेरीस प्रारंभ करून तो २०२२ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण पुणे ते बंगलोर या रस्त्याची टोल वसुली करण्याच्या हालचाली राष्टÑीय महामार्ग विभागामार्फत केले जात आहे.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग- दुपदरीकरण पूर्ण : २००२, - चारपदरीकरण पूर्ण : २००५, - सहापदरीकरण पूर्ण : २०२२ (सद्या अपूर्ण)अधिकाऱ्यांचे मौनराज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्र्ीय महामार्ग विभाग यांच्यात भविष्यात टोल आकारणी कोणी करायची याबाबत पूर्वीची करारातील मुदत संपण्याची वाट पाहिली जात आहे. हे सातारा-कागल सहापदरीकरण रखडण्याचे मूळ कारण आहे. याबाबत मंत्रालयातून हालचाली होत असल्यामुळे अधिकारी मात्र मौन बाळगून राहिले आहे.