शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

साखर निर्यातीचे लक्ष्य ७० टक्के गाठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:58 IST

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याअखेर २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली ैआहे. यातील १७ लाख ४४ हजार टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. हंगामाअखेर ही निर्यात ३५ लाख टनांवर जाण्याची शक्यता असून, ती लक्ष्याच्या सुमारे ७० टक्के असेल असा अंदाज आहे.देशातील साखर हंगाम १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर असा असतो. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही साखरेचे बंपर म्हणजे ३२६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशाची गरज २६० लाख टनांची असल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न यंदाही कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने ५० लाख टन साखरेचे उद्दिष्ट निश्चित करताना साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही देशांतर्गत दरापेक्षा कमी असल्याने कारखान्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. मात्र, अनुदानासाठी निर्यात कोटा पूर्ण करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. त्यामुळे प्रसंगी तोटा सोसूनही कारखाने निर्यातीचा कोटा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळेच गेल्या महिन्यात (८ मार्च ते ६ एप्रिल) ६ लाख १३ हजार १९२ टन साखरेची निर्यात झाली आहे, तर १ आॅक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०१९ या काळात २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे.यातील १७ लाख ४४ हजार २७ टन साखर परदेशात पोहोचली आहे. ४ लाख १३ हजार १४२ टन साखर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींमध्ये आहे. निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे आठ लाख टन साखर कच्ची आणि नऊ लाख टन साखर पांढरी (व्हाईट) आहे. आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने ही माहिती दिलीआहे.भारताची साखर ५० देशांना निर्यातभारताची साखर ५० देशांना निर्यात होत आहे. त्यात बांगलादेशाला सर्वाधिक ३ लाख ५६ हजार ७२८ टन निर्यात झाली आहे. निर्यातीची ही टक्केवारी २०.४५ टक्के आहे. त्याखालोखाल २ लाख ८७ हजार ४९८ टन म्हणजेच १६.४८ टक्के साखर श्रीलंकेला निर्यात झाली आहे. त्यानंतर सोमालिया, इराण, सुदान, आदी देशांचा क्रम लागतो.