शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीचे लक्ष्य ७० टक्के गाठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:58 IST

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याअखेर २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली ैआहे. यातील १७ लाख ४४ हजार टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. हंगामाअखेर ही निर्यात ३५ लाख टनांवर जाण्याची शक्यता असून, ती लक्ष्याच्या सुमारे ७० टक्के असेल असा अंदाज आहे.देशातील साखर हंगाम १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर असा असतो. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही साखरेचे बंपर म्हणजे ३२६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशाची गरज २६० लाख टनांची असल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न यंदाही कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने ५० लाख टन साखरेचे उद्दिष्ट निश्चित करताना साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही देशांतर्गत दरापेक्षा कमी असल्याने कारखान्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. मात्र, अनुदानासाठी निर्यात कोटा पूर्ण करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. त्यामुळे प्रसंगी तोटा सोसूनही कारखाने निर्यातीचा कोटा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळेच गेल्या महिन्यात (८ मार्च ते ६ एप्रिल) ६ लाख १३ हजार १९२ टन साखरेची निर्यात झाली आहे, तर १ आॅक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०१९ या काळात २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे.यातील १७ लाख ४४ हजार २७ टन साखर परदेशात पोहोचली आहे. ४ लाख १३ हजार १४२ टन साखर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींमध्ये आहे. निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे आठ लाख टन साखर कच्ची आणि नऊ लाख टन साखर पांढरी (व्हाईट) आहे. आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने ही माहिती दिलीआहे.भारताची साखर ५० देशांना निर्यातभारताची साखर ५० देशांना निर्यात होत आहे. त्यात बांगलादेशाला सर्वाधिक ३ लाख ५६ हजार ७२८ टन निर्यात झाली आहे. निर्यातीची ही टक्केवारी २०.४५ टक्के आहे. त्याखालोखाल २ लाख ८७ हजार ४९८ टन म्हणजेच १६.४८ टक्के साखर श्रीलंकेला निर्यात झाली आहे. त्यानंतर सोमालिया, इराण, सुदान, आदी देशांचा क्रम लागतो.