शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

४० लाख टन साखर निर्यात करा

By admin | Updated: August 6, 2015 21:44 IST

राजू शेट्टींची मागणी : साखर उद्योगावरील संकट जाण्यास मदत होईल

जयसिंगपूर : देशातील शिल्लक असलेल्या साखरेतील ४० लाख टन साखर त्वरित निर्यात करण्यात यावी, तसेच साखर उद्योगाला संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.याबाबत खा. शेट्टी म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांत साखरेचे दर अधिक ढासळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देखील मिळालेला नाही. यामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचे गंभीर परिणाम बाजारपेठेवरदेखील जाणवत आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे २० हजार कोटींहून अधिक आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निदान एफआरपी तर देता यावी यासाठी साखर कारखान्यांना ६००० कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. आज रोजी पेट्रोलियम कंपन्यांना इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत पाहिली तर साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये उत्सुक नाहीत, असे दिसते. देशातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारला दीर्घकालीन योजना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्वरित ४० लाख टन साखर निर्यात करणे जरूरीचे आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न मिटून साखरेचे दर वाढून स्थिर राहण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून, ५० टक्के साखर व ५० टक्के इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने उभे केले पाहिजेत. तसेच साखरेचा बफर स्टॉक करणे, साखरेचे दर वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये घरगुती दर वेगळे व उद्योग धंद्यासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगळे असे दुहेरी किमतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थ वीजनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे साखर उद्योगावर आलेले संकट जाण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)