शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

४० लाख टन साखर निर्यात करा

By admin | Updated: August 6, 2015 21:44 IST

राजू शेट्टींची मागणी : साखर उद्योगावरील संकट जाण्यास मदत होईल

जयसिंगपूर : देशातील शिल्लक असलेल्या साखरेतील ४० लाख टन साखर त्वरित निर्यात करण्यात यावी, तसेच साखर उद्योगाला संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.याबाबत खा. शेट्टी म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांत साखरेचे दर अधिक ढासळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देखील मिळालेला नाही. यामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचे गंभीर परिणाम बाजारपेठेवरदेखील जाणवत आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे २० हजार कोटींहून अधिक आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निदान एफआरपी तर देता यावी यासाठी साखर कारखान्यांना ६००० कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. आज रोजी पेट्रोलियम कंपन्यांना इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत पाहिली तर साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये उत्सुक नाहीत, असे दिसते. देशातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारला दीर्घकालीन योजना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्वरित ४० लाख टन साखर निर्यात करणे जरूरीचे आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न मिटून साखरेचे दर वाढून स्थिर राहण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून, ५० टक्के साखर व ५० टक्के इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने उभे केले पाहिजेत. तसेच साखरेचा बफर स्टॉक करणे, साखरेचे दर वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये घरगुती दर वेगळे व उद्योग धंद्यासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगळे असे दुहेरी किमतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थ वीजनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे साखर उद्योगावर आलेले संकट जाण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)