शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

४० लाख टन साखर निर्यात करा

By admin | Updated: August 6, 2015 21:44 IST

राजू शेट्टींची मागणी : साखर उद्योगावरील संकट जाण्यास मदत होईल

जयसिंगपूर : देशातील शिल्लक असलेल्या साखरेतील ४० लाख टन साखर त्वरित निर्यात करण्यात यावी, तसेच साखर उद्योगाला संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.याबाबत खा. शेट्टी म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांत साखरेचे दर अधिक ढासळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देखील मिळालेला नाही. यामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचे गंभीर परिणाम बाजारपेठेवरदेखील जाणवत आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे २० हजार कोटींहून अधिक आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निदान एफआरपी तर देता यावी यासाठी साखर कारखान्यांना ६००० कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. आज रोजी पेट्रोलियम कंपन्यांना इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत पाहिली तर साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये उत्सुक नाहीत, असे दिसते. देशातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारला दीर्घकालीन योजना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्वरित ४० लाख टन साखर निर्यात करणे जरूरीचे आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न मिटून साखरेचे दर वाढून स्थिर राहण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून, ५० टक्के साखर व ५० टक्के इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने उभे केले पाहिजेत. तसेच साखरेचा बफर स्टॉक करणे, साखरेचे दर वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये घरगुती दर वेगळे व उद्योग धंद्यासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगळे असे दुहेरी किमतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थ वीजनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे साखर उद्योगावर आलेले संकट जाण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)