शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारीकरणाला पर्यायांचा शोध

By admin | Updated: June 13, 2016 00:35 IST

वनविभागाच्या जागेशिवाय आराखडा ?: धावपट्टी, तांत्रिक सुविधांची जागा बदलल्यास ‘पहिेले पाढे पंचावन्न ’

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाची सुरुवात व्हावी यासाठी शासन वनविभागाची जागा वगळण्यासाठीच्या पर्यायांचा विचार करत आहे. त्यासाठी वनविभागाची जागा वगळून विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याची सूचना शासनातर्फे जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी केली आहे. धावपट्टीची दुरुस्ती, विमान कंपन्यांचा नकार, विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे अतिरिक्त भूसंपादन अशा कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरची विमान सेवा बंद आहे. ती सुरू होण्यासह या ठिकाणी मोठी विमाने उतरविण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त ५.६० हेक्टर जमिनीची गरज आहे. विमानतळाच्या गडमुडशिंगीकडील बाजूला वनविभागाची दहा हेक्टर जमीन आहे. त्यातील पाच हेक्टर जमीन देण्यास वनविभाग तयार आहे. नव्या वनकायद्यानुसार वनविभागाची जमीन देताना गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. मात्र, याबाबत अजूनही या ग्रामपंचायतीने विमानतळासाठी जमीन देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. अशा स्थितीत विस्तारीकरणासाठी एक पर्याय म्हणून वनविभागाची जागा वगळून काही करता येईल का? याची चाचपणी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रशासनाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीने वनविभागाच्या जागेशिवाय विस्तारीकरण आराखडा पुन्हा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे झाल्यास धावपट्टी व तांत्रिक सुविधांची जागाच बदलावी लागणार आहे. ते शक्य नसल्यामुळे ही प्रक्रियाच रखडण्याची शक्यता आहे.ताांत्रिकदृष्ट्या वनविभागाची जमीनच योग्यकेंद्र सरकारने कोल्हापूर विमानतळाच्या विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या विमानतळाच्या विकासाचा आराखडा डिसेंबर २०१५ मध्ये तयार केला आहे. त्याचे काम भारतीय विमानतळ पतन प्राधिकरणाने केले आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण करणे, पार्किंगची सुविधा, प्रवाशांसाठी नवी टर्मिनल बिल्ंिडग, आदी कामांचा समावेश आहे. ाया आराखड्यानुसार तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरणासाठी वनविभागाच्या जमिनीचा एकमेव योग्य पर्याय असल्याचे सूत्रांनी सांगितले.वनविभागाच्या जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास आम्ही तयार आहोत. याबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही होईपर्यंत संबंधित जमिनीमध्ये गवत विकसित केले जाणार आहे.रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक, वनविभागविस्तारीकरणाच्या सुधारित आराखड्याबाबत दिल्ली कार्यालयातील नियोजन विभागाकडून निर्णय घेतला जाईल, ए. रझाक, व्यवस्थापक, कोल्हापूर विमानतळ ‘नागरी उड्डाण’च्या मान्यतेनंतरच कार्यवाहीया जागेशिवाय विस्तारीकरणाचा आराखडा तयार करावयाचा झाल्यास धावपट्टी, तांत्रिक सुविधांची जागा बदलावी लागणार आहे. शिवाय सुधारित आराखडा नागरी उड्डाण विभागाला मान्यतेसाठी सादर करावा लागणार असल्याने विस्तारीकरणाची प्रक्रिया वेगाने होणे आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न ’अशी अवस्था होणार आहे.