शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

‘हॅमरल’मध्ये कामगारांची पिळवणूक

By admin | Updated: July 26, 2015 00:43 IST

विजय कांबळे यांची तक्रार : कामगार आयुक्तालयावर मोर्चा काढणार

कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एफ. एम. हॅमरल टेक्स्टाईल लिमिटेड ही कंपनी श्रमिक उत्कर्ष सभेसोबत केलेल्या कामगार कराराची पायमल्ली करीत आहे. कामगार आयुक्त कार्यालय आणि राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापन कामगारांशी मनमानी व्यवहार करीत आहे. याबाबत कामगारमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास इचलकरंजी सहायक कामगार आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. कांबळे म्हणाले, या कंपनीने श्रमिक उत्कर्ष सभेसोबत कामगारांची पगारवाढ, उत्पादनाशी निगडित बोनस व इतर सोयी-सवलतींबाबतचा करार केला होता. संघटनेकडे बीआयआर अ‍ॅक्ट १९४८ प्रमाणे प्रतिनिधित्व नव्हते; पण तरीही संघटनेकडे कंपनीचे सर्व कामगार सभासद असल्यामुळे हा करार करण्यात आला होता; पण दुसरा करार करतेवेळी मात्र कंपनीने कामगारांवर दबावतंत्र वापरून त्यांना दुसऱ्या स्थानिक संघटनेत सहभागी होण्यास भाग पाडले. या दरम्यान संबंधित कंपनीने स्थानिक पुढाऱ्यांशी हातमिळवणी करीत कामगारांचे नुकसान करणारे करार केले. ही बाब कामगारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पुन्हा ‘श्रमिक उत्कर्ष’कडे धाव घेतली. याबाबतची लेखी माहिती संबंधित कंपनीला पाठविली; पण बीआयआर अ‍ॅक्ट १९४८ अन्वये प्रतिनिधित्व करण्यास पात्र नाही, या सबबीखाली संबंधित कंपनीने आमच्याशी बोलणी करण्यास टाळाटाळ केली, असा आरोपही कांबळे यांनी केला. कांबळे म्हणाले, बीआयआर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कामगारांचे पाच प्रतिनिधी निवडून देण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांना पत्र पाठविले. या पत्राची दखल घेत २१ जून २०१५ रोजी सहायक कामगार आयुक्तांनी कंपनीत येऊन कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कामगारांतून पाच प्रतिनिधी निवडण्याचे निश्चित केले होते; पण राजकीय दबावाला बळी पडत प्रतिनिधी निवडण्यासाठी कामगार अधिकारी आलेच नाहीत. कामगार आयुक्तांचे मालकधार्जिणे धोरण, दुसऱ्या बाजूला स्थानिक पुढाऱ्यांचा दबाव यांमुळे कंपनीमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कामगारांच्या तक्रारींची दखल सहायक कामगार आयुक्त घेत नाहीत. मालकांच्या तक्रारींची दखल मात्र ते लगेच घेतात. त्यामुळे इचलकरंजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)