शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

टनाला ५0 ते १०० रूपयांचा फटका : प्रत्येक गाडी, ट्रॅक्टरमागे खुशालीची मागणी

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा : गेल्या काही वर्षापासून ऊसतोडणी मजुरांना प्रत्येक गाडीमागे पैसे देण्याचा एक नवीनच पायंडा पडला आहे. लाच घेतल्याशिवाय ते फडाला हात लावत नाहीत. हे कारखान्याला माहीत असूनही ते संबंधितांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या मजुरांचे फावले आहे. लाच दिल्याने शेतकऱ्यांना सरासरी टनाला ५० ते १०० रूपयांचा फटाक बसतो. गळीत हंगाम सुरू झाला की सुरूवातीचे काही दिवस पैस न घेता मजुर तोडणी करतात नंतर मात्र ट्रक व ट्रॅक्टरला ५०० ते १००० रू असा लाचेचा दर पाडतात. शेतकरी ऊसाला तोडणी आल्यावर पैसे देण्यास नकार देवू लागला तर सरळ ऊस न तोडण्याची धमकी देतात. त्यामुळे हाता पाया पडून आणलेली तोडणी परत जाऊ नये म्हणून शेतकरी नाईलाजास्तव पैसे द्यायला तयार होतात. काही मोठ्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास जरी परवडत असले तरी लहान शेतकऱ्यांना म्हणजे दहा गुंठे, अर्धा एकर किंवा एकरभर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पैसे देणे परवडत नाही. तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई म्हणून कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटनेने जाब विचारावा, अशी मागणी होत आहे. तसेच कारखान्यानेही याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी होत आहे. मुबलक पाऊस : तरीही दुष्काळकोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात सधन समजला जातो. मात्र, त्याच जिल्ह्यातील एका भागात मुबलक पाऊस पडूनही वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे विरोधाभासाचे चित्र पहावयास मिळत आहे. ४साठवण प्रकल्प नसल्याने धामणी खोऱ्यातील शेतकरी आपल्या जिवावर उदार होऊन स्वखर्चाने बंधारे बांधून पाणी अडवून आपली शेती जगवितो व आपणही जगतो आहे. ४दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड थांबविण्यासाठी या परिसरास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या आजोबा वडील यांच्या काळापासुनच धामणी नदीवर बंधारा बांधुन पाणी अडवण्याविषयी मी ऐकुन होतो. त्यांच्याप्रमाणेच मी शेती करायला लागल्यापासुन मीही मातीचा बंधारा बांधुन त्यातील पाण्यावरच शेती जगवत आहे. अन्य पर्याय नसल्याने मातीचे बंधारे बांधण्याशिवाय पर्याय नाही. बंधारे बांधले तरच या परिसरातील शेतकरी जगणार आहे. आतातरी सरकारने लक्ष द्यावे. - महिपती शंकर चौधरी, चौधधरवाडी, ता. गगनबावडा.माझे वय ८५ वर्षांच्या पुढे असुन माझ्या लहानपणापासुन अशा प्रकारे मातीचे बंधारे नदीवर बांधुन पुर्ण अडविण्याची प्रथा आहे. आमची हयात बंधारे बांधण्यात संपली. आतातरी सरकारने आमची पाण्याची सोय करून पुढच्या पिढीला या चक्रव्युहातून सोडवाव.- भाऊ बाळा पाटील, म्हासुर्ली, लाभधारक शेतकरी