शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

दीडशे कोटींच्या ढपल्याचे स्पष्टीकरण द्या

By admin | Updated: April 11, 2015 00:09 IST

राजू शेट्टी यांची मागणी : पैशापेक्षा ‘गोकुळ’चे हित बघूनच मतदान करण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सुमारे दीडशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे केला आहे. त्याची सत्यता किती आहे याचे संघाच्या व्यवस्थापनाने प्रत्येक मुद्देनिहाय स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. संघाच्या ठरावधारक मतदारांनीही छोट्या आर्थिक लाभापेक्षा संघ व दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊनच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.शेट्टी म्हणाले, ‘सतेज पाटील यांच्या आरोपांबाबत नुसती गोलमाल उत्तरे दिल्यास त्यातून लोकांच्या मनात साशंकता निर्माण होईल. अगोदरच ‘गोकुळ’च्या व्यवहाराबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनात शंका आहेत. कारण या सहकारी संघाचा कारभार पाच-सहा म्होरके कारभारी संचालक आपल्या बापाची संस्था असल्यासारखा करतात. तिथे कोणत्याच व्यवहाराबाबत पारदर्शकता पाळली जात नाही. गोकुळ संघ राज्य व केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेतो; परंतु तरीही संघाला माहितीचा अधिकार लागू होत नाही, असे सांगून कोणतीच माहिती बाहेर जाऊ नये, याची दक्षता घेतली जाते. ‘गोकुळ’ हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. त्यांच्या कष्टातूनच संघाला आजचे वैभव प्राप्त झाले आहे. संघाचे जिल्ह्णाच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान आहे. लाखो शेतकऱ्यांचे संसार त्याच्याशी जोडले गेले आहेत म्हणून संघाचा व्यवहार जास्त चोख असला पाहिजे अन्यथा ‘गोकुळ’ची अवस्था ‘महानंद’ किंवा केडीसीसी’ बँकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही.’ ज्यांनी ‘केडीसीसी’ बँक रसातळाला घालवली, अशा पक्षाची मदत घेऊन ‘गोकुळ’मधील सत्तारूढ नक्की काय करू इच्छितात, याचाही खुलासा होण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी केली आहे.‘गोकुळ’चे मोठेपण कशात...जिल्ह्यातील दुधाला चांगली चव असल्यानेच ‘गोकुळ’च्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणूनच ‘गोकुळ’चा नावलौकिक आहे. त्याचे श्रेय व्यवस्थापन व संचालकांनी घेऊ नये. गुजरातचे ‘अमूल’ दूध मुंबईत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ काबीज करत आहे. त्यास टक्कर द्यायची झाल्यास कारभार पारदर्शकच ठेवण्याची गरज असल्याचे खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.एका मताची ताकदसंघाच्या निवडणुकीत दूध संस्थांचे ठरावधारक मतदार असतात. त्यांना निवडणुकीपुरते खूश करायचे व सत्ता मिळवायची, असा व्यवहार ‘गोकुळ’मध्ये सुरू आहे. त्यामुळे ठरावधारक मतदारांचीच आता जबाबदारी वाढली आहे. संघ कुणाच्या हातात दिल्यावर तो सुरक्षित राहील, याचा विचार त्यांनी करावा.