शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

By admin | Updated: May 30, 2016 01:27 IST

हाळवणकरांची मुश्रीफांवर टीका : नंगे-पुंगे आडवे आले तरीही प्रकल्प पूर्ण करणारच

कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्याचा आपण भूमिपुत्र असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले तर त्यात गैर काय? पण काही मंडळींना ते रुचले नाही. एक वर्षात आपला खासगी साखर कारखाना काढता, मग नागनवाडी प्रकल्प पंधरा वर्षांत पूर्ण का होत नाही, अशी विचारणा करत हसन मुश्रीफ म्हणजे ‘अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडी’चे असल्याची टीका आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. नंग्या-पुंग्यांना घाबरत नसून कोणीही आडवे आले तरी प्रकल्प मार्गी लावणारच, असा इशाराही त्यांनी दिला. तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेवरून गेले दोन दिवस आमदार हसन मुश्रीफ यांनी आमदार हाळवणकर यांच्यावर टीका केली होती. त्याला पाणी परिषदेत हाळवणकर यांनी उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून जनभावनाचा आदर करायला शिकले पाहिजे; पण काही मंडळींना २४ तास राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह के. पी. पाटील यांना बोलावले होते. जलसंपदा मंत्री असताना ज्यांना नागनवाडीचा प्रश्न सोडविता आला नाही, त्यांना बोलावले तर शेतकऱ्यांचा रोष ओढावून दगडफेक करतील, यासाठीच हसन मुश्रीफ यांना निमंत्रित केले नाही; पण हाळवणकरांचा कागलशी काय संबंध, अशी विचारणा करतात, आपण धामणी (आजरा) या गावचा भूमिपुत्र आहे, याचा विसर मुश्रीफ यांना पडला आहे. या परिसरातील भूमिपुत्र म्हणून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी प्रयत्न केला त्यात गैर काय केले. एका वर्षात स्वत:चा साखर कारखाना उभा करता मग पंधरा वर्षे हा प्रकल्प मार्गी का लावला नाही. सत्ता गेली तरी अजून मुश्रीफ यांच्या डोक्यातील सत्तेची मस्ती गेलेली नाही. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे, असे नंग्या-पुंग्यांना घाबरत नाही. कितीही राजकीय ताकद आडवी आली तरी प्रकल्प पूर्ण करणारच, असा इशाराही हाळवणकर यांनी दिला. शेतकऱ्यांनी कोणाचेही ऐकू नका, तुमचा विश्वासघात केला जाणार नाही, एकीची वज्रमूठ बांधून हरितक्रांती आणूया, असेही त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार फटकेबाजी करत हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘म्हातारीचा सडा’ पाण्याबाबत मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली पण त्याचा दुसऱ्या प्रकल्पांवर काही परिणाम होईल का? यासाठी वनविभागाची चर्चा सुरू होती. विकासकामांत आम्ही कधीच आडवे येत नाही, येत्या चार-आठ दिवसांत त्याचे उद्घाटन होईल, असे आबिटकर यांनी सांगितले. कागलचा हत्ती अन् दादांची मिरवणूक!‘राजकारणातील स्वच्छ चेहरा’ म्हणून सामान्य माणूस चंद्रकांतदादांकडे पाहतो. वसंतदादांनंतर चंद्रकांतदादा असल्याने खूप अपेक्षा आहेत. दादा, येथील काही मंडळी हत्तीवरून मिरवणूक काढण्याची भाषा करतात. सर्व प्रकल्प मार्गी लावून १० टीएमसी पाणी अडवा, तुमची कागलमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आमदार आबिटकर म्हणाले.