शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

By admin | Updated: May 30, 2016 01:27 IST

हाळवणकरांची मुश्रीफांवर टीका : नंगे-पुंगे आडवे आले तरीही प्रकल्प पूर्ण करणारच

कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्याचा आपण भूमिपुत्र असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले तर त्यात गैर काय? पण काही मंडळींना ते रुचले नाही. एक वर्षात आपला खासगी साखर कारखाना काढता, मग नागनवाडी प्रकल्प पंधरा वर्षांत पूर्ण का होत नाही, अशी विचारणा करत हसन मुश्रीफ म्हणजे ‘अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडी’चे असल्याची टीका आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. नंग्या-पुंग्यांना घाबरत नसून कोणीही आडवे आले तरी प्रकल्प मार्गी लावणारच, असा इशाराही त्यांनी दिला. तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेवरून गेले दोन दिवस आमदार हसन मुश्रीफ यांनी आमदार हाळवणकर यांच्यावर टीका केली होती. त्याला पाणी परिषदेत हाळवणकर यांनी उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून जनभावनाचा आदर करायला शिकले पाहिजे; पण काही मंडळींना २४ तास राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह के. पी. पाटील यांना बोलावले होते. जलसंपदा मंत्री असताना ज्यांना नागनवाडीचा प्रश्न सोडविता आला नाही, त्यांना बोलावले तर शेतकऱ्यांचा रोष ओढावून दगडफेक करतील, यासाठीच हसन मुश्रीफ यांना निमंत्रित केले नाही; पण हाळवणकरांचा कागलशी काय संबंध, अशी विचारणा करतात, आपण धामणी (आजरा) या गावचा भूमिपुत्र आहे, याचा विसर मुश्रीफ यांना पडला आहे. या परिसरातील भूमिपुत्र म्हणून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी प्रयत्न केला त्यात गैर काय केले. एका वर्षात स्वत:चा साखर कारखाना उभा करता मग पंधरा वर्षे हा प्रकल्प मार्गी का लावला नाही. सत्ता गेली तरी अजून मुश्रीफ यांच्या डोक्यातील सत्तेची मस्ती गेलेली नाही. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे, असे नंग्या-पुंग्यांना घाबरत नाही. कितीही राजकीय ताकद आडवी आली तरी प्रकल्प पूर्ण करणारच, असा इशाराही हाळवणकर यांनी दिला. शेतकऱ्यांनी कोणाचेही ऐकू नका, तुमचा विश्वासघात केला जाणार नाही, एकीची वज्रमूठ बांधून हरितक्रांती आणूया, असेही त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार फटकेबाजी करत हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘म्हातारीचा सडा’ पाण्याबाबत मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली पण त्याचा दुसऱ्या प्रकल्पांवर काही परिणाम होईल का? यासाठी वनविभागाची चर्चा सुरू होती. विकासकामांत आम्ही कधीच आडवे येत नाही, येत्या चार-आठ दिवसांत त्याचे उद्घाटन होईल, असे आबिटकर यांनी सांगितले. कागलचा हत्ती अन् दादांची मिरवणूक!‘राजकारणातील स्वच्छ चेहरा’ म्हणून सामान्य माणूस चंद्रकांतदादांकडे पाहतो. वसंतदादांनंतर चंद्रकांतदादा असल्याने खूप अपेक्षा आहेत. दादा, येथील काही मंडळी हत्तीवरून मिरवणूक काढण्याची भाषा करतात. सर्व प्रकल्प मार्गी लावून १० टीएमसी पाणी अडवा, तुमची कागलमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आमदार आबिटकर म्हणाले.