शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कोल्हापुरात दिवसभर तीन ऋतूंचा अनुभव

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

ढगाळ वातावरण : पावसाचा शिडकावा; पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता

कोल्हापूर : पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता अशाप्रकारे गुरुवारी दिवसभर हिवाळा, पावसाळा, उन्हाळा अशा तीन ऋतूंचा अनुभव आला. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी राहिली. हवामान ढगाळ राहिले. सायंकाळपर्यंत कोणत्याही क्षणी मोठा पाऊस सुरू होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, वळवाने चकवा दिला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात वळीव पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी पहाटेपासूनच आकाशात ढग दाटून आले. पहाटे हवेत कमालीचा गारवा होता. अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. बारा वाजता काहीवेळ पावसाचा शिडकावा झाला. दुपारी दोननंतर हवेत उष्णता प्रचंड वाढली. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा बसला तरी उष्णतेने अंगाची लाहीलाही झाली. कार्यालयांत गारव्यासाठी पंख्यांची गरगर सुरू राहिली. मेच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी आणि ढगाळ वातावरण राहिल्यामुळे नेमका हंगाम कोणता सुरू आहे, यासंबंधी काहीकाळ प्रत्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित होत राहिला. अनेकजणांनी पावसाळ्याचे वातावरण आहे आणि दुपारची उष्णता उन्हाळ्यातील आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ढगाळ वातावरणामुळे काहीजण अंगदुखीने हैराण झाले. (प्रतिनिधी) पडणारा पाऊस ऊसपिकाला आणि खरीपपूर्व मशागतीला अतिशय पोषक ठरत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत पाऊस जोरदार पडल्याने जमिनीत ओल तयार झाली आहे. वापसा नसल्याने मशागतीची कामे ठप्प आहेत. पुढील आठवड्यात भातपिकाची पेरणी सुरू होईल. - मोहन आटोळे, कृषी अधीक्षकरुग्णालयांत गर्दीहवामानात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे अंगदुखी, तर वळीव पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप असे आजार होत आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होत आहे. त्यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश अधिक आहे.