शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात दिवसभर तीन ऋतूंचा अनुभव

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

ढगाळ वातावरण : पावसाचा शिडकावा; पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता

कोल्हापूर : पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता अशाप्रकारे गुरुवारी दिवसभर हिवाळा, पावसाळा, उन्हाळा अशा तीन ऋतूंचा अनुभव आला. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी राहिली. हवामान ढगाळ राहिले. सायंकाळपर्यंत कोणत्याही क्षणी मोठा पाऊस सुरू होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, वळवाने चकवा दिला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात वळीव पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी पहाटेपासूनच आकाशात ढग दाटून आले. पहाटे हवेत कमालीचा गारवा होता. अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. बारा वाजता काहीवेळ पावसाचा शिडकावा झाला. दुपारी दोननंतर हवेत उष्णता प्रचंड वाढली. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा बसला तरी उष्णतेने अंगाची लाहीलाही झाली. कार्यालयांत गारव्यासाठी पंख्यांची गरगर सुरू राहिली. मेच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी आणि ढगाळ वातावरण राहिल्यामुळे नेमका हंगाम कोणता सुरू आहे, यासंबंधी काहीकाळ प्रत्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित होत राहिला. अनेकजणांनी पावसाळ्याचे वातावरण आहे आणि दुपारची उष्णता उन्हाळ्यातील आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ढगाळ वातावरणामुळे काहीजण अंगदुखीने हैराण झाले. (प्रतिनिधी) पडणारा पाऊस ऊसपिकाला आणि खरीपपूर्व मशागतीला अतिशय पोषक ठरत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत पाऊस जोरदार पडल्याने जमिनीत ओल तयार झाली आहे. वापसा नसल्याने मशागतीची कामे ठप्प आहेत. पुढील आठवड्यात भातपिकाची पेरणी सुरू होईल. - मोहन आटोळे, कृषी अधीक्षकरुग्णालयांत गर्दीहवामानात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे अंगदुखी, तर वळीव पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप असे आजार होत आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होत आहे. त्यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश अधिक आहे.