शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आरसीएच’ केंद्राचा खर्च नगरपालिकांवर

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

प्रत्येक केंद्राकडे एक महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, हिशेबनीस व शिपाई नेमण्याची तरतूद करण्यात आली होती.

राजाराम पाटील - इचलकरंजी --केंद्र सरकार पुरस्कृत असलेली रिप्रॉडक्टिव्ह चाईल्ड अँड हेल्थ (आरसीएच) केंद्रे नगरपालिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चालवावीत, असे राज्य शासनाने नगरपालिकांना कळविल्यामुळे खळबळ उडाली आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नगरपालिकांवर आरसीएच केंद्रांचा खर्च बोकांडी बसेल, याची चिंता नगरपालिकांकडून व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत नगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येवर आधारित आरसीएच केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामागे कुटुंब हे केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन त्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले राहावे, असे तत्त्व होते. याशिवाय शहरात राहणाऱ्या सर्व कुटुंबांची कुटुंबनिहाय माहिती या केंद्रांकडे संकलित होत असे. प्रत्येक केंद्राकडे एक महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, हिशेबनीस व शिपाई नेमण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच या केंद्राशी आशा वर्कर्स व आरोग्यसेविका यालाही संलग्न करण्याची सुविधा होती. आरसीएच केंद्राकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासह येणाऱ्या खर्चापोटी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. ही सर्व केंद्रे सध्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली सुरू आहेत.ही आरसीएच केंद्रे आता सरकारने नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (एनयुएचएम)कडे वर्ग केली आहेत. या प्रक्रियेमध्ये गेल्या चार महिन्यांचे वेतन या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले नव्हते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेतनापोटी मिळणारे अनुदान नुकतेच प्राप्त झाले आहे. शासनाच्या पत्रानुसार आरसीएच केंद्रे पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चालविल्यास केंद्रांकडील अनुदान प्राप्त झाले नाही, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची असेल, अशी भीती वाटत आहे. तसेच काही दिवसांनी आरसीएच केंद्रे पालिकेच्या रुग्णालयाकडे वर्ग झाल्यास केंद्राकडील वेतन व खर्च कायमचा बोकांडी बसेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.