शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

हारतुऱ्यावरच खर्च सहा महिन्यांत नुसतेच प्रस्ताव

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

आदर्श गावचा सुरुवातीला असणारा गावकऱ्यांचा उत्साह आता हळूहळू ओसरू लागला आहे.

राजाराम लोंढे - कोल्हापूर -पंतप्रधानांनी आदर्श सांसद ग्राम योजनेच्या माध्यमातून देशातील गावे विकासात्मकदृष्ट्या मॉडेल करण्याची घोषणा केली. त्यानुसार शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गाव खासदार राजू शेट्टी यांनी दत्तक घेतले. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन समस्यांचा आढावा घेत विकासकामांचे प्रस्ताव तयार केले. मात्र, सहा महिने उलटले तरी विकासकामांचा श्रीगणेशाही झालेला दिसत नाही. बैठकांसाठी येणाऱ्यांच्या स्वागतावर ग्रामपंचायतीचे मात्र सुमारे ५० हजार खर्ची पडल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे आदर्श गावचा सुरुवातीला असणारा गावकऱ्यांचा उत्साह आता हळूहळू ओसरू लागला आहे. पेरीड या गावचा इतिहासच वेगळा आहे. येथे एकोपा व राजकारणविरहित विकासाची प्रक्रिया राबविली जात असल्याने गाव तसे सर्वच पातळीवर स्वयंपूर्ण आहे. असे गाव खासदार शेट्टी यांनी दत्तक घेतल्याने पेरीड राज्यात निश्चितच मॉडेल बनेल, असा विश्वास साऱ्या तालुक्याला आहे. आता सर्वांच्या नजरा गावच्या विकासाकडे लागल्या आहेत; मात्र सांसद ग्राम योजनेचे स्वप्न ज्या पद्धतीने दाखविले, त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गावाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन गावातील विकासकामांचा प्रस्ताव तयार केला. खासदार शेट्टी यांनीही याबाबत एकदा बैठक घेऊन चर्चा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी गावच्या असलेल्या समस्या आहे तशाच आहेत. पावसाळा आला तरी विकासकामांचा पत्ता नसल्याने ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे. सहा महिन्यांत कोणत्याच विकासकामांची सुरुवात झालेली नाही. विविध कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्याला मंजुरी देऊन कामांना लवकर सुरुवात व्हावी. - अनिता राजाराम पाटील, सरपंच, पेरीडसांसद ग्राम योजनेत २०१४-१५ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद नव्हती. २०१५-१६ या वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे येथून पुढे प्रस्तावांना मान्यता मिळून कामांची सुरुवात होईल. अधिकाऱ्यांच्या एक-दोन बैठका झाल्या असल्या तरी आम्ही शासकीय पातळीवर सतत संपर्कात आहे.- पी. एन. पाटील, ग्रामसेवक, पेरीडराजू शेट्टी--पेरीड