शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

गगनबावडा तालुक्यातील डोंगरांगांना विदेशी वनस्पतींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST

गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या रांगांनी दूरवर पसरलेला आहे. या डोंगरातील काही पठारी प्रदेशावर निमसदाहरित वनस्पती मोठ्या ...

गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या रांगांनी दूरवर पसरलेला आहे. या डोंगरातील काही पठारी प्रदेशावर निमसदाहरित वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसतात. गेल्या काही वर्षांपासून साळवण, मणदूर, मांडुकली, शेणवडे, अणदूर, असळज, सैतवडे, सांगशी, बोरबेट या भागातील डोंगरमाथ्यावर सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून डोंगर हिरवे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निलगिरी, ऑस्टेलियन बाभळ, गिरीपुष्प, गुलमोहर यांची लागवड अगदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या भागातील डोंगर पठारावर विदेशी झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्थानिक वनस्पती व जैवविविधता मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. या विदेशी वनस्पतींना घाणारे पशुपक्षी व सुक्ष्म जीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील आहेत. या वनस्पतींवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यांचा पाला फळे खात नाहीत. या वृक्षाची, वनस्पतीची पानझड झाल्यावर या वनस्पतींच्या खाली साधे गवतही उगवत नाही. झाडाचा पाला जामिनीवर साचून राहतो तो कुजतदेखील नाही. सध्या तर रानमोडी या परकीय झुडपाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे. परिणामी, डोंगर पठरावर असणारे प्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून शिवाराकडे स्थलांतर करतात. गिरीपुष्प सारख्या वनस्पतीमुळे स्थानिक असणाऱ्या वनस्पती त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. विदेशी वनस्पती शेजारी असणारी स्थानिक झाडे मृत पडत आहेत. या वनस्पतीच्या फुलांच्या वासामुळे अनेक सरपटणारे प्राणी वस्तीत, शिवारात घुसत आहेत. या वनस्पतींच्या फुलांचा वास इतका उग्र असतो की पशुपक्षी फिरकत नाहीत. भविष्यात वृक्ष लागवड करताना वन विभागाने सामाजिक वनविभागाने अभ्यास करून येथील जैवविविधतेला पूरक असणाऱ्या वड, पिंपळ,कडूलिंब, चिंच, आंबा, उंबर, बाभूळ या फळे, फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करावी जेणेकरून येथे सजीव सृष्टी समृद्ध होणार आहे.

[ अनेक डोंगर पठारावर विदेशी झाडांची लागवड केल्यामुळे जैवविविधतेत मोठा धोका निर्माण झाला आहे. या विदेशी वनस्पतींवर पशु-पक्षी बसत नाहीत, घरटे बांधत नाहीत. आपल्या भागातील जैवविविधता देशी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. शोभेसाठी जंगले वाढविणे गरजेचे नाही, तर त्याचा वापर जैवविविधता टिकविण्यासाठी झाला पाहिजे. ] निसर्गप्रेमी = अमर मारुतीराव जत्राटे. (बालिंगे )

फोटो वृत्त = शेणवडे (ता. गगनबावडा) येथील डोंगरावर उंचच्या उंच वाढलेली विदेशी वनस्पती.