शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यातील डोंगररांगांना विदेशी वनस्पतींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST

या विदेशी वनस्पतींना पूरक पशुपक्षी व सूक्ष्मजीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील असून या झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. ...

या विदेशी वनस्पतींना पूरक पशुपक्षी व सूक्ष्मजीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील असून या झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यांचा पाला, फळे खात नाहीत. या वृक्ष, वनस्पतींची पानझड झाल्यावर या वनस्पतींच्या खाली साधे गवतही उगवत नाही. झाडाचा पाला जामिनीवर साचून राहतो तो कुजतदेखील नाही. सध्या तर रानमोडी या परकीय झुडपाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचे उच्चाटन करण्याचे गरज आहे. परिणामी, डोंगरपठारांवर असणारे प्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून शिवाराकडे स्थलांतर करतात. गिरिपुष्पसारख्या वनस्पतीमुळे स्थानिक असणाऱ्या वनस्पती त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. विदेशी वनस्पती शेजारी असणारी स्थानिक झाडे मृत होत आहेत. या वनस्पतीच्या फुलांच्या वासामुळे अनेक सरपटणारे प्राणी वस्तीत, शिवारात घुसत आहेत. या वनस्पतींच्या फुलांचा वास इतका उग्र असतो की पशुपक्षी फिरकत नाहीत. भविष्यात वृक्षलागवड करताना वन विभागाने सामाजिक वनविभागाने अभ्यास करून येथील जैवविविधतेला पूरक असणाऱ्या वड, पिंपळ, कडूलिंब, चिंच, आंबा, उंबर, बाभूळ या फळे-फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करावी; जेणेकरून येथे सजीवसृष्टी समृद्ध होणार आहे.

अनेक डोंगरपठारांवर विदेशी झाडांची लागवड केल्यामुळे जैवविविधतेत मोठा थोका निर्माण झाला आहे. या विदेशी वनस्पतींवर पशुपक्षी बसत नाहीत, घरटे बांधत नाहीत. आपल्या भागातील जैवविविधता देशी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. शोभेसाठी जंगले वाढविणे गरजेचे नाही; तर त्यांचा वापर जैवविविधता टिकविण्यासाठी झाला पाहिजे.

निसर्गप्रेमी : अमर मारुतीराव जत्राटे ( बालिंगे )