शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ग्राम दक्षता समित्यांचे अस्तित्व मांडव घालण्यापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र ...

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र अजूनही शांतताच आहे. कोरोनाच्या दक्षतेसाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या दक्षता समित्याही सुस्तावल्या असून लसीकरणासाठी मांडव घालण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व राहिले आहे. बाकी प्रबोधन वगैरे कुठेही दिसत नाही.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने राज्य सरकारने अंशत: लाॅकडाऊनची तयारी म्हणून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गावपातळीवरील दक्षता समित्यांनी पुन्हा कामास लागावे असे आदेश दिले आहे. याला आठवडाभराचा कालावधी होत आला तरी समित्या अद्याप सक्रिय झालेल्या नाहीत.

कोरोनाचा कहर शिथिल झाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन नवीन कारभारी सत्तेवर आले आहेत. गावपातळीवरील दक्षता समित्यांमध्ये विद्यमान सरपंचांचाही समावेश आहे. नवे कारभारी सत्तेवर आलेल्या गावांमध्ये नव्या समित्यांची स्थापना होणे अपेक्षित होते. पण ते अद्याप झालेले नसल्याने जुन्याच समित्या आपल्या सवडीनुसार काम पाहत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती, कंटेन्मेंट झोन इत्यादीविषयी त्यांच्याकडून पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही. गावात रुग्ण आढळला तर त्याच्या नियोजनची जबाबदारी या समित्यांकडे होती, पण आता कोणी कुणाला आदेश द्यायचा यावरुन संभ्रम असल्याने बऱ्यापैकी अंग काढून घेतल्याचेच चित्र गावोगावी दिसत आहे. कोराेना काळात ग्रामसमित्यांनी केलेल्या कडक निर्बंधाचा व सोईच्या भूमिकांचा हिशेब ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी चुकता केलेला असल्याने घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणार कोण? अशीही मानसिकता समिती सदस्यांची दिसत आहे.

सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने या दक्षता समित्यांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्यांना बैठकीची व्यवस्था, उन्हापासून रक्षणासाठी मंडप घालणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे इतकीच कामे केली जात आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी अजूनही ती आवाक्यात असल्याने गावोगावी त्याबद्दल अजूनही फारशी दक्षता बाळगली जात नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळेही समित्या स्थापन करून कोरोना उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामसमित्यांनी चांगले काम करून दाखविले.