शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

ग्राम दक्षता समित्यांचे अस्तित्व मांडव घालण्यापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र ...

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र अजूनही शांतताच आहे. कोरोनाच्या दक्षतेसाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या दक्षता समित्याही सुस्तावल्या असून लसीकरणासाठी मांडव घालण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व राहिले आहे. बाकी प्रबोधन वगैरे कुठेही दिसत नाही.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने राज्य सरकारने अंशत: लाॅकडाऊनची तयारी म्हणून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गावपातळीवरील दक्षता समित्यांनी पुन्हा कामास लागावे असे आदेश दिले आहे. याला आठवडाभराचा कालावधी होत आला तरी समित्या अद्याप सक्रिय झालेल्या नाहीत.

कोरोनाचा कहर शिथिल झाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन नवीन कारभारी सत्तेवर आले आहेत. गावपातळीवरील दक्षता समित्यांमध्ये विद्यमान सरपंचांचाही समावेश आहे. नवे कारभारी सत्तेवर आलेल्या गावांमध्ये नव्या समित्यांची स्थापना होणे अपेक्षित होते. पण ते अद्याप झालेले नसल्याने जुन्याच समित्या आपल्या सवडीनुसार काम पाहत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती, कंटेन्मेंट झोन इत्यादीविषयी त्यांच्याकडून पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही. गावात रुग्ण आढळला तर त्याच्या नियोजनची जबाबदारी या समित्यांकडे होती, पण आता कोणी कुणाला आदेश द्यायचा यावरुन संभ्रम असल्याने बऱ्यापैकी अंग काढून घेतल्याचेच चित्र गावोगावी दिसत आहे. कोराेना काळात ग्रामसमित्यांनी केलेल्या कडक निर्बंधाचा व सोईच्या भूमिकांचा हिशेब ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी चुकता केलेला असल्याने घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणार कोण? अशीही मानसिकता समिती सदस्यांची दिसत आहे.

सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने या दक्षता समित्यांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्यांना बैठकीची व्यवस्था, उन्हापासून रक्षणासाठी मंडप घालणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे इतकीच कामे केली जात आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी अजूनही ती आवाक्यात असल्याने गावोगावी त्याबद्दल अजूनही फारशी दक्षता बाळगली जात नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळेही समित्या स्थापन करून कोरोना उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामसमित्यांनी चांगले काम करून दाखविले.