शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम दक्षता समित्यांचे अस्तित्व मांडव घालण्यापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र ...

कोल्हापूर: कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पुन्हा लॉकडाऊनचे नगारे वाजू लागले तरी गावागावात मात्र अजूनही शांतताच आहे. कोरोनाच्या दक्षतेसाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या दक्षता समित्याही सुस्तावल्या असून लसीकरणासाठी मांडव घालण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व राहिले आहे. बाकी प्रबोधन वगैरे कुठेही दिसत नाही.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने राज्य सरकारने अंशत: लाॅकडाऊनची तयारी म्हणून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गावपातळीवरील दक्षता समित्यांनी पुन्हा कामास लागावे असे आदेश दिले आहे. याला आठवडाभराचा कालावधी होत आला तरी समित्या अद्याप सक्रिय झालेल्या नाहीत.

कोरोनाचा कहर शिथिल झाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन नवीन कारभारी सत्तेवर आले आहेत. गावपातळीवरील दक्षता समित्यांमध्ये विद्यमान सरपंचांचाही समावेश आहे. नवे कारभारी सत्तेवर आलेल्या गावांमध्ये नव्या समित्यांची स्थापना होणे अपेक्षित होते. पण ते अद्याप झालेले नसल्याने जुन्याच समित्या आपल्या सवडीनुसार काम पाहत आहेत. कोरोनाविषयी जनजागृती, कंटेन्मेंट झोन इत्यादीविषयी त्यांच्याकडून पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही. गावात रुग्ण आढळला तर त्याच्या नियोजनची जबाबदारी या समित्यांकडे होती, पण आता कोणी कुणाला आदेश द्यायचा यावरुन संभ्रम असल्याने बऱ्यापैकी अंग काढून घेतल्याचेच चित्र गावोगावी दिसत आहे. कोराेना काळात ग्रामसमित्यांनी केलेल्या कडक निर्बंधाचा व सोईच्या भूमिकांचा हिशेब ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी चुकता केलेला असल्याने घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणार कोण? अशीही मानसिकता समिती सदस्यांची दिसत आहे.

सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने या दक्षता समित्यांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्यांना बैठकीची व्यवस्था, उन्हापासून रक्षणासाठी मंडप घालणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे इतकीच कामे केली जात आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी अजूनही ती आवाक्यात असल्याने गावोगावी त्याबद्दल अजूनही फारशी दक्षता बाळगली जात नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळेही समित्या स्थापन करून कोरोना उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामसमित्यांनी चांगले काम करून दाखविले.