शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

महापालिकांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST

कुलूप लावण्याची वेळ : एलबीटी निर्णयानंतर उत्पन्नाला फटका; केवळ १७ व्यापारीच पात्र

भारत चव्हाण, कोल्हापूर : पन्नास कोटींच्या आत ज्या व्यापारी व उद्योजकांची वार्षिक उलाढाल आहे, अशा सर्वांना एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारापर्यंत राज्य सरकार पोहोचले असले तरी असा निर्णय घेणे म्हणजे महानगरपालिकांच्या अस्तित्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे. उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेला एलबीटी अशाप्रकारे रद्द करण्याचा जर सरकारने निर्णय घेतलाच, तर मात्र महानगरपालिकांना कुलूप लावण्याची वेळ येईल, अशी भीतीही व्यक्त केली जाते. राज्य सरकारने शुक्रवारी एलबीटी कायद्यातील बदलाबाबत अधिसूचना काढली असून, एक महिन्यात त्यावर हरकती सादर करायच्या आहेत. सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली असली तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महापालिका यंत्रणा मोडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही घेतला जातो. महानगरपालिका कार्यक्षेत्रात आधी जकात होती, परंतु जकातीची प्रक्रिया त्रासदायक आणि कालबाह्य ठरत असल्याचा दावा करीत व्यापारी व उद्योजक वर्गाने त्यास विरोध केला. त्यामुळे जकातीला एलबीटीचा पर्याय स्वीकारला गेला, परंतु एलबीटी कायदा हा थोडा अधिक कडक असल्याने व्यापाऱ्यांनी त्यालाही विरोध केला. गेली तीन वर्षे त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पराभवातील ते एक कारण ठरले. भाजप, शिवसेना नेत्यांनी एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करताना त्यांच्याही तोंडाला फेस आला आहे. व्यापाऱ्यांनी जकात अथवा एलबीटी द्यायला कधीच विरोध केला नाही, परंतु त्याच्या वसुलीची प्रक्रिया आणि कायद्यातील क्लिष्ट तरतुदी यामुळे दोन्ही करांना विरोध झाला. त्यासाठी व्हॅटमध्ये एक टक्का सरचार्जचा पर्याय पुढे आणला, परंतु असा सरचार्ज आकारणे तांत्रिकदृष्ट्या सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळे एलबीटी व्यापारी आणि राज्य सरकारचीही डोकेदुखी ठरली, परंतु व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. अखेर राज्य सरकार नमले आणि ५० कोटींच्या आतील उलाढाल असणाऱ्यांना एलबीटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत सरकार पोहोचले आहे.