शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

इचलकरंजीत ‘लेक वाचवा अभियाना’चे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: December 26, 2014 00:08 IST

प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ‘अर्थ’कारण शोधण्याच्या प्रवृत्तीमुळे योजना असफल

इचलकरंजी : नवजात मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव नगरपालिकेने ठेवल्यास स्त्री-भ्रूणहत्येला आळा बसेल, अशा उदात्त हेतूने येथील पालिका सभेत सर्वानुमते ठराव झाला. त्याला चार वर्षे उलटली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे ‘लेक वाचवा अभियाना’ची मोहीम रखडली आणि आता तर तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे.सन २०१० मध्ये मंजूर झालेल्या या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात यावी, यासाठी प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करणे आवश्यक होते. तसेच खऱ्या अर्थाने निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या लोककल्याणकारी योजनेचा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरणे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक होते; पण प्रत्येक कामात ‘अर्थ’कारणाचा शोध घेणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी ‘लेक वाचवा मोहिमे’कडे दुर्लक्षच केल्याचे निदर्शनात येत आहे.राज्य शासनाने आता सुकन्या योजना लागू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्म घेणाऱ्या कन्येच्या नावे २१ हजार २०० रुपयांची ठेव शासन ठेवणार आहे. याबाबतचा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत आला असताना नगरपालिकेच्या चार वर्षांपूर्वीच्या तत्कालीन नगराध्यक्षा मेघा चाळके यांच्या अध्यक्षतेखालील सभेत नवजात कन्येच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव नगरपालिकेने ठेवण्याच्या विषयाची आठवण आली. गेल्या सभागृहातील काही सदस्य चालू सभागृहातसुद्धा नगरसेवक आहेत, त्यांनीही जुन्या स्मृतींना उजाळा दिला.पूर्वीच्या ठरावावर चर्चा करताना उपविधीतील त्रुटी चविष्टपणे चघळण्यात आल्या, तर त्यावेळी शासनाचाच विरोध झाल्याचेही सांगण्यात आले. ही बाब पालिकेच्या कर्तव्यात बसत नसल्याचेही बोलले गेले. वास्तविक पाहता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी लेक वाचवा योजनेच्या मंजुरीसाठी पुढे काहीही प्रयत्न केले नाहीत. पाठपुरावा झाला असता तर शासनाच्या सुकन्या योजनेप्रमाणे त्याचवेळी इचलकरंजी नगरपालिकेची योजना अस्तित्वात आली असती, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)तीनशे कुटुंबांची खंतनगरपालिकेच्या तत्कालीन लेक वाचवा योजनेसाठी सुमारे तीनशे कुटुंबीयांनी अर्जही केले होते. अर्ज करण्यासाठी संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करताना हजार-दीड हजार रुपये खर्चही घातले होते; पण सर्व काही व्यर्थ गेल्याची खंत या तीनशे कुटुंबांना आहे.