शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

साळवणमधील भवानी मातेच्या मंदिराचा ‘वनवास’च सुटेना

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

पर्यटन विकासाची मोठी संधी : सरस्वती-जांभळी नद्यांच्या संगमावर मंदिर

एम. ए. शिंदे - साळवण पोलीस ठाण्याच्या पीछाडीस उंच डोंगरावर वनराईत वसलेले भवानी मातेचे मंदिर पर्यटनदृष्ट्या उपेक्षित आहे. सरस्वती-जांभळी नद्यांच्या संगमावरील या मंदिराचा व टेकडीचा शासनाने विकास आराखडा तयार करून परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होईल.वनविभागाच्या हद्दीतील सागवानी वनात हे मंदिर आहे. पूर्वीच्या जुन्या मंदिराकडे भाविक जाण्यास धजत नसत. साळवण पोलीस ठाण्याच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. चार फूट रुंदीच्या या रस्त्याची अवस्था कुठे दगड, तर कुठे खड्डा, अशी असून, याच रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे रस्त्याची धूप होऊन रस्त्यातच घळण निर्माण झाली आहे. या ठिकाणी पक्का रस्ता झाला तरच दुचाकी व चारचाकी वाहने मंदिरापर्यंत पोहोचतील. मंदिर पूर्वाभिमुख असून, सध्या आर.सी.सी. पद्धतीचे बांधकाम झाले आहे. सततच्या पावसामुळे मंदिराच्या वरच्या बाजूला स्लॅबवर गवत उगवले आहे. मंदिराची समोरील भिंत काळवंडली आहे. दरवाजा लोखंडी ग्रीलचा असून, त्यावर गंज चढू लागला आहे. मंदिराच्या पायाकडील बाजूचे दगड निखळू लागले आहेत. मंदिरासमोर चौथरा आहे; मात्र त्या चौथऱ्यावर फरशी नाही. चारही भिंती शेवाळल्या आहेत. मंदिर पायऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी पत्र्याचे मंदिर आहे. अडीच ते तीन फूट उंचीच्या भिंतीवर मारलेला पत्रा सध्या सडण्याच्या अवस्थेत आहे. पत्रा वाऱ्यामुळे उडून जाऊ नये म्हणून त्यावर विटा ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोर नंदी आहे; मात्र नंदीची झीज होऊ लागली आहे. मंदिरात महादेवाची पिंड आहे. मंदिर टेकडीच्या उजव्या बाजूने जांभळी, तर डाव्या बाजूने सरस्वती नदी वाहत गेली असून, टेकडीच्या पूर्वेकडील बाजूस दोन्ही नद्यांचा संगम झाला आहे. संगमापासून पुढे या नदीला कुंभी म्हणून ओळखले जाते. संगमाजवळील पात्रात पर्यटकांच्या दृष्टीने बोटिंग सुरू करता येणे शक्य आहे. नदीपात्रातील पाणी लिफ्ट करून मोठा आकर्षक बगीचा तयार करणे शक्य आहे. वनविभागाने यापूर्वी विकास आराखडा तयार केला होता; पण त्याचा पाठपुरावा झाला नाही. (वार्ताहर)भवानी मातेच्या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा वनविभागाचा परिसर असल्यामुळे वनविभाग व पर्यटन विकास महामंडळ यांनी सामुदायिक प्रयत्नांतून विकास करावा. पर्यावरणाचा ऱ्हास न होता विकास व्हावा. पर्यटन खात्याने वेगळा निधी द्यावा यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.- संभाजी भालेकर, सामाजिक कार्यकर्ते