शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जोतिबावर पायाभूत सुविधांसाठी कसरत

By admin | Updated: April 18, 2016 01:10 IST

उत्पन्न ४३ लाख, खर्च ७३ लाख जमा खर्चात ३० लाखांची तफावत ग्रामपंचायत प्रशासन मेटाकुटीला

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला वर्षाकाठी ४३ लाखांचे उत्पन्न, तर खर्च ७३ लाखांवर जात असल्याने जमा खर्चामध्ये ३० लाखांची तफावत भरून काढताना ग्रामपंचायत प्रशासन मेटाकुटीला आले आहे. नळ पाणीपुरवठा योजना ही आता पांढरा हत्ती ठरत आहे.श्री क्षेत्र जोतिबा डोंगरला वर्षाकाठी ७० ते ८० लाख भाविक पर्यटक भेट देतात. वर्षभरात दोन मुख्य यात्रा, सन, उत्सव, नगरदिंडीला येणाऱ्या भाविकांना पायाभूत सोयी सुविधा पुरविताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर मोठा ताण पडतो. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती यांचा यात्रा व्यवस्थापनावर खर्च वाढत आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत कमी आहेत. यात्रा करातून मिळणारे उत्पन्नही अपुरे पडत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२४ मधील ५ ख ३ नुसार ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम १९६० नुसार भाग ४ नुसार सन २००५-०६ पासून माणसी कर घेण्यास सरुवात झाली. प्रथम प्रती माणसी एक रुपया यात्रा कर घेतला जात होता. सन २०१२-१३ पासून हा प्रती माणसी दोनरुपया घेतला जाऊ लागला. नळ पाणीपुरवठा, वीज बिल, दिवाबत्ती, स्वच्छता या खर्चासाठी यात्रा कराची तरतूद शासनाने केली; पंरतु हेच उत्पन्न आता ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरत आहे. यात्रा करातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी २२ ते २३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. यातून फक्त नळ पाणीपुरवठा वीज बिलाची पूर्तता होते. जोतिबा डोंगरावर सध्या १२ कि.मी. अंतरावरील केर्ली गावातून जाणाऱ्या कासारी नदीतून पाणीपुरवठा चालू आहे. २४ तास पाणी उपसा असल्याने महिन्याला वीज बिल २ ते ३ लाखांच्या आसपास येते. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना म्हणजे ग्रामपंचायतीला गैरसोयीची होत आहे. घरपट्टी, आरोग्य कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी करातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी २१ लाख उत्पन्न मिळते. यामध्ये २४ कर्मचाऱ्यांचा पगार, शौचालय सफाई, दिवाबत्ती साहित्य, रस्ते व गटर्स स्वच्छता, अंत्यविधी साहित्य, कार्यालय खर्च, नळ पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती, यात्रा व्यवस्थापन साठी ४० ते ५० लाखांपर्यंत खर्च होतो. ग्रामपंचायतीला एकूण ४३ लाखाच्या आसपास वर्षाला उत्पन्न मिळते. खर्च मात्र ७३ लाखांच्या आसपास होतो. जमाखर्चामध्ये ३० लाखांची तफावत असल्याने भाविकांना सोयीसुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)देवस्थान समिती : २२ लाख ५0 हजार येणेपश्चितम महाराष्ट्र देवस्थान समिती कडून ग्रामपंचायतीला २२लाख ५० हजार येणे बाकी आहे. हा निधी अजूनही मिळालेला नाही. अधिक सुविधा व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे गरजेचे असल्याचे सरपंच रिया सांगळे यांनी सांगितले.