शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

वीजबिल माफ करा, अन्यथा लढा सुरूच राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जोपर्यंत राज्य सरकार कोरोना काळातील वीजबिल माफ करीत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. केवळ अधिवेशन पार पाडण्यासाठी ...

कोल्हापूर : जोपर्यंत राज्य सरकार कोरोना काळातील वीजबिल माफ करीत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. केवळ अधिवेशन पार पाडण्यासाठी सरकार जनतेची भलावण करत असेल, तर एक दिवस महाराष्ट्र बंदची हाक द्यावी लागेल तसेच वीज बिल भरणार नाही, असा इशारा कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिला. वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी कृती समितीच्या मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

साळोखे म्हणाले, राज्य शासनाने उन्हाळी अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोरोना महामारी काळातील सहा महिन्यांचे वीजबिल वसुलीसाठी स्थगिती दिली आहे. टोलमाफीसारखे लाॅलिपाॅप देऊन जनतेची भलावण केली. त्याचप्रमाणे अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार व शासन जनतेची भलावण करीत आहेत. हे सर्व न करण्यासाठी शासनाने त्वरित त्या काळातील वीजबिले माफ करावीत. अन्यथा महाराष्ट्र बंदची हाक द्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात वीज तोडणी बंद करण्याचे आदेश असतानाही काही गावांमध्ये वीज तोडली जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागासह तरुण मंडळांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबा पार्टे म्हणाले, अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्पुरत्या स्वरूपात ही घोषणा केली असल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे महावितरणने कृषी व घरांची वीज तोडू नये, अशी मागणी केली. यावेळी बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, जोतिराम घोडके, सचिन घाटगे, ॲड. दत्ताजी कवाळे, बाबासाहेब पोवार, दुग्रेस लिंग्रज, अशोक भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.