शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांना ज्ञानदान करणारी उत्तूर केंद्रशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:55 IST

रवींद्र येसादे । लोकमत न्यूज नेटवर्क उत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक ...

रवींद्र येसादे ।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक चळवळ सुरू केली. तोच उद्देश साध्य करण्यासाठी बावीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आजरा तालुक्यातील उत्तूर येथे स्वातंत्र्यपूर्वकाळात १८ डिसेंबर १९७० यावर्षी शाळेची स्थापना करण्यात आली. आज या जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेची वाटचाल दीड शतकाकडे सुरू आहे. वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बहुमोल कार्य या केंद्रशाळेने आतापर्यंत केले आहे. तसेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आतापर्यंत शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम शिक्षकांनी उत्तमरीत्या पार पाडले आहे.ही शाळा जेथे रिकामे घर तेथे भरत असे. मुले शिकली पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेवून ग्रामस्थ शाळेसाठी विनामोबदला घरे देत. पागार गल्लीतील चौंडेश्वरी मंदिर, महादेव मंदिर, गावांतील मठ, आदी ठिकाणी शाळा भरत असे.मुला-मुलींची एकत्र असणारी ही शाळा कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळानंतर जि.प.ची मंजुरी मिळाल्यानंतर कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर या नावाने वेगवेगळ््या ठिकाणी सुरू झाल्या. कुमार विद्यामंदिर झेंडे-पाटील यांच्या घरासमोर जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या खोल्यांत, तर कन्या शाळा ग्रामपंचायतीच्या मागे (खंदक) येथे सुरू झाली.स्वातंत्र्यपूर्वकाळातील एकमेव शाळा, तसेच दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने या शाळेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा होता. क्वचितप्रसंगी इंग्रजी माध्यमासाठी मुले गडहिंग्लज येथे जात असत अन्यथा उत्तूर येथेच शिक्षण घेत. राज्यात केंद्रशाळांची निर्मिती झाल्यानंतर या शाळेचे स्वरूपच बदलून गेले. मुलांची शाळा केंद्रीय शाळा बनली. बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, आर्दाळ, करपेवाडी, चव्हाणवाडी, झुलपेवाडी, बेलेवाडी व उत्तूर येथील खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ही शाळा एक केंद्रस्थान बनून गेली.स्पर्धात्मक युगात शाळा टिकली पाहिजे यासाठी शिक्षकांनी केलेले योगदान आजअखेर कायम आहे. शाळेतून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर येथील माजी विद्यार्थी वकील, डॉक्टर, अभियंता बनले आहेत, तर काही प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या केंद्रशाळा ही ग्रामपंचायतीमागे असणाºया (खंदक) येथे स्थलांतरित केली आहे. भौतिक सुविधा, ई- लर्निंग, आदी सुविधांनी शाळा सुसज्ज आहे. शाळेचा गतवर्षीचा पट १४८ इतका झाला आहे.राज्य गुणवत्ता यादीत आजअखेर ५६ विद्यार्थी गुणवत्ताधारक बनल्याने शाळेचे नाव राज्यस्तरावर चमकले आहे. शाळेने ‘शिष्यवृत्तीधारक शाळा’ असा नावलौकिक केल्याने येथे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय पोवार, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, नीलिमा पाटील, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.२०२० मध्ये होणार दीडशतक पूर्णया शाळेतील शिक्षक दरवर्षी १८ डिसेंबर हा शाळेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हिरिरीने भाग घेतात. पहाटे पाचच्या सुमारास गावातून प्रभात फेरी काढून शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन यांच्या हस्ते केले जाते. केंद्रशाळा अंतर्गत सर्व शाळा सहभागी होतात. १८ डिसेंबर २०२० ला शाळेस दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत.शाळा मंजुरीसाठी कै. मुकुंदरावदादा आपटेंचे योगदानमंदिर, मठानंतर रिकामे घर तेथे शाळा भरायची. शाळेस जि.प.ची मंजुरी नव्हती. कै. मुकुंदराव दादा आपटे यांनी कन्या व कुमार या शाळांना मंजुरीसाठी प्रयत्न केले. यास यश येत या शाळांना मंजुरी मिळाली. मग जि.प. च्या जागेत या शाळा स्थिरावू लागल्या. याकामी आपटे यांचे योगदान मोठे आहे.माजी विद्यार्थी राष्ट्रपतीपदक विजेतेशाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय मुळीक हे पुढे शिक्षक बनून शाळेत आले. ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे.‘शिष्यवृती’त भरघोस यशगेल्या दहा वर्षांत शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावला आहे. योग्य मार्गदर्शनामुळे राज्यस्तरावर शाळेचे विद्यार्थी शिष्यवृतीधारक बनलेत. ही शाळा शिष्यवृत्तीची शाळा म्हणून लौकिकास पात्र ठरली आहे.