शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वंचितांना ज्ञानदान करणारी उत्तूर केंद्रशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:55 IST

रवींद्र येसादे । लोकमत न्यूज नेटवर्क उत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक ...

रवींद्र येसादे ।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक चळवळ सुरू केली. तोच उद्देश साध्य करण्यासाठी बावीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आजरा तालुक्यातील उत्तूर येथे स्वातंत्र्यपूर्वकाळात १८ डिसेंबर १९७० यावर्षी शाळेची स्थापना करण्यात आली. आज या जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेची वाटचाल दीड शतकाकडे सुरू आहे. वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बहुमोल कार्य या केंद्रशाळेने आतापर्यंत केले आहे. तसेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आतापर्यंत शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम शिक्षकांनी उत्तमरीत्या पार पाडले आहे.ही शाळा जेथे रिकामे घर तेथे भरत असे. मुले शिकली पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेवून ग्रामस्थ शाळेसाठी विनामोबदला घरे देत. पागार गल्लीतील चौंडेश्वरी मंदिर, महादेव मंदिर, गावांतील मठ, आदी ठिकाणी शाळा भरत असे.मुला-मुलींची एकत्र असणारी ही शाळा कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळानंतर जि.प.ची मंजुरी मिळाल्यानंतर कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर या नावाने वेगवेगळ््या ठिकाणी सुरू झाल्या. कुमार विद्यामंदिर झेंडे-पाटील यांच्या घरासमोर जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या खोल्यांत, तर कन्या शाळा ग्रामपंचायतीच्या मागे (खंदक) येथे सुरू झाली.स्वातंत्र्यपूर्वकाळातील एकमेव शाळा, तसेच दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने या शाळेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा होता. क्वचितप्रसंगी इंग्रजी माध्यमासाठी मुले गडहिंग्लज येथे जात असत अन्यथा उत्तूर येथेच शिक्षण घेत. राज्यात केंद्रशाळांची निर्मिती झाल्यानंतर या शाळेचे स्वरूपच बदलून गेले. मुलांची शाळा केंद्रीय शाळा बनली. बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, आर्दाळ, करपेवाडी, चव्हाणवाडी, झुलपेवाडी, बेलेवाडी व उत्तूर येथील खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ही शाळा एक केंद्रस्थान बनून गेली.स्पर्धात्मक युगात शाळा टिकली पाहिजे यासाठी शिक्षकांनी केलेले योगदान आजअखेर कायम आहे. शाळेतून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर येथील माजी विद्यार्थी वकील, डॉक्टर, अभियंता बनले आहेत, तर काही प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या केंद्रशाळा ही ग्रामपंचायतीमागे असणाºया (खंदक) येथे स्थलांतरित केली आहे. भौतिक सुविधा, ई- लर्निंग, आदी सुविधांनी शाळा सुसज्ज आहे. शाळेचा गतवर्षीचा पट १४८ इतका झाला आहे.राज्य गुणवत्ता यादीत आजअखेर ५६ विद्यार्थी गुणवत्ताधारक बनल्याने शाळेचे नाव राज्यस्तरावर चमकले आहे. शाळेने ‘शिष्यवृत्तीधारक शाळा’ असा नावलौकिक केल्याने येथे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय पोवार, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, नीलिमा पाटील, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.२०२० मध्ये होणार दीडशतक पूर्णया शाळेतील शिक्षक दरवर्षी १८ डिसेंबर हा शाळेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हिरिरीने भाग घेतात. पहाटे पाचच्या सुमारास गावातून प्रभात फेरी काढून शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन यांच्या हस्ते केले जाते. केंद्रशाळा अंतर्गत सर्व शाळा सहभागी होतात. १८ डिसेंबर २०२० ला शाळेस दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत.शाळा मंजुरीसाठी कै. मुकुंदरावदादा आपटेंचे योगदानमंदिर, मठानंतर रिकामे घर तेथे शाळा भरायची. शाळेस जि.प.ची मंजुरी नव्हती. कै. मुकुंदराव दादा आपटे यांनी कन्या व कुमार या शाळांना मंजुरीसाठी प्रयत्न केले. यास यश येत या शाळांना मंजुरी मिळाली. मग जि.प. च्या जागेत या शाळा स्थिरावू लागल्या. याकामी आपटे यांचे योगदान मोठे आहे.माजी विद्यार्थी राष्ट्रपतीपदक विजेतेशाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय मुळीक हे पुढे शिक्षक बनून शाळेत आले. ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे.‘शिष्यवृती’त भरघोस यशगेल्या दहा वर्षांत शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावला आहे. योग्य मार्गदर्शनामुळे राज्यस्तरावर शाळेचे विद्यार्थी शिष्यवृतीधारक बनलेत. ही शाळा शिष्यवृत्तीची शाळा म्हणून लौकिकास पात्र ठरली आहे.