शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

मूल्यांकनाची तांत्रिक बाजू तपासणार : आयुक्त

By admin | Updated: February 5, 2015 00:29 IST

टोल प्रश्न : रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची फसगत : कृती समितीची आयुक्तांना माहिती

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची मोठी फसगत झाली आहे. आता टोल हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ‘आयआरबी’ला दिलेल्या टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फूट जागेचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. प्रकल्पास महापालिकेने मान्यता (कन्फर्मिंग पार्टी) दिली आहे. त्यामुळे टोल हटविताना कोल्हापूरकरांवर भुर्दंड बसणार नाही, याची काळजी घ्या, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. लवकरच होणाऱ्या रस्ते मूल्यांकनातील तांत्रिक बाजू महापालिका तपासेल, फसगत होणार नाही, काळजी करू नका, असे आश्वासन आयुक्तांनी कृती समितीला दिले.शहरातील वादग्रस्त टोल हटविण्यासाठी राज्य शासनाने टोलला पर्याय देण्यासाठी उच्चस्तरीय नेमली आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टोल आंदोलनाची पार्श्वभूमी व रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची झालेली फसगत आज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नूतन आयुक्तांच्या कानांवर घातली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपस्थित होते.टोल लादताना महापालिका प्रशासनाने अक्षरश: शहरवासीयांना गहाण ठेवले. टोल करार प्रक्रियेत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करा, जेणेकरून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, अशी मागणी अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केली. गेल्या पाच वर्षांत रस्त्यांची डागडुजी न करणाऱ्या आयआरबीने आता रंगरंगोटी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी केलेला खर्च गेल्या पाच वर्षांत केल्याचे भासविण्याचा हा प्रयत्न आहे, अशी सूचना माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी केली. कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी आयुक्तांना असोसिएशनतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अशोक पोवार, दीपाताई पाटील, जयकुमार शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मूल्यांकन समिती पुढील आठवड्यात : नितीन देसाईकोल्हापूर : राज्य शासनाने शहरातील वादग्रस्त टोलबाबत पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने प्रकल्पाचे नेमके मूल्यांकन करण्यासाठी पाचजणांची त्रयस्थ समिती नेमली आहे. या समिती स्थापनेचा शासन आदेश सोमवार (दि. ९) पर्यंत निघण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील आठवड्यात ही समिती कोल्हापूर दौऱ्यावर येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कार्यकर्त्यांशी आज, बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी. शिवशंकर होते. राज्य शासनाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. समितीने पहिल्याच बैठकीत त्रयस्थ समिती नेमून एका महिन्यात प्रकल्पाचा नेमका खर्च ठरविण्याची घोषणा झाली. समितीची बैठक होऊन दहा दिवस झाले तरी त्रयस्थ समिती अद्याप कोल्हापूूूरला आलेली नाही. याबाबत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन वेळा रस्ते प्रकल्पाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा अहवाल बाहेर आलाच नाही. आता नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता असल्याने विरोध केला. आताच्या समितीमध्ये महापालिका व आर्किटेक्ट असोसिएशनचा प्रतिनिधी घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकन समितीचे स्वागत करू. आणखी काही काळ वाट पाहण्याची तयारी आहे. समितीला कृती समिती सहकार्य करील, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी स्पष्ट केले.रस्ते प्रकल्पाबाबत सर्व माहिती घेतली आहे. मूल्यांकनाच्या सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत शहरवासीयांवर भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेऊ. - पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त