शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मूल्यांकनाची तांत्रिक बाजू तपासणार : आयुक्त

By admin | Updated: February 5, 2015 00:29 IST

टोल प्रश्न : रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची फसगत : कृती समितीची आयुक्तांना माहिती

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची मोठी फसगत झाली आहे. आता टोल हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ‘आयआरबी’ला दिलेल्या टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फूट जागेचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. प्रकल्पास महापालिकेने मान्यता (कन्फर्मिंग पार्टी) दिली आहे. त्यामुळे टोल हटविताना कोल्हापूरकरांवर भुर्दंड बसणार नाही, याची काळजी घ्या, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. लवकरच होणाऱ्या रस्ते मूल्यांकनातील तांत्रिक बाजू महापालिका तपासेल, फसगत होणार नाही, काळजी करू नका, असे आश्वासन आयुक्तांनी कृती समितीला दिले.शहरातील वादग्रस्त टोल हटविण्यासाठी राज्य शासनाने टोलला पर्याय देण्यासाठी उच्चस्तरीय नेमली आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टोल आंदोलनाची पार्श्वभूमी व रस्ते प्रकल्पात कोल्हापूरकरांची झालेली फसगत आज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नूतन आयुक्तांच्या कानांवर घातली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपस्थित होते.टोल लादताना महापालिका प्रशासनाने अक्षरश: शहरवासीयांना गहाण ठेवले. टोल करार प्रक्रियेत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करा, जेणेकरून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, अशी मागणी अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केली. गेल्या पाच वर्षांत रस्त्यांची डागडुजी न करणाऱ्या आयआरबीने आता रंगरंगोटी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी केलेला खर्च गेल्या पाच वर्षांत केल्याचे भासविण्याचा हा प्रयत्न आहे, अशी सूचना माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी केली. कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी आयुक्तांना असोसिएशनतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अशोक पोवार, दीपाताई पाटील, जयकुमार शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मूल्यांकन समिती पुढील आठवड्यात : नितीन देसाईकोल्हापूर : राज्य शासनाने शहरातील वादग्रस्त टोलबाबत पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने प्रकल्पाचे नेमके मूल्यांकन करण्यासाठी पाचजणांची त्रयस्थ समिती नेमली आहे. या समिती स्थापनेचा शासन आदेश सोमवार (दि. ९) पर्यंत निघण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील आठवड्यात ही समिती कोल्हापूर दौऱ्यावर येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कार्यकर्त्यांशी आज, बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी. शिवशंकर होते. राज्य शासनाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. समितीने पहिल्याच बैठकीत त्रयस्थ समिती नेमून एका महिन्यात प्रकल्पाचा नेमका खर्च ठरविण्याची घोषणा झाली. समितीची बैठक होऊन दहा दिवस झाले तरी त्रयस्थ समिती अद्याप कोल्हापूूूरला आलेली नाही. याबाबत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन वेळा रस्ते प्रकल्पाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा अहवाल बाहेर आलाच नाही. आता नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता असल्याने विरोध केला. आताच्या समितीमध्ये महापालिका व आर्किटेक्ट असोसिएशनचा प्रतिनिधी घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकन समितीचे स्वागत करू. आणखी काही काळ वाट पाहण्याची तयारी आहे. समितीला कृती समिती सहकार्य करील, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी स्पष्ट केले.रस्ते प्रकल्पाबाबत सर्व माहिती घेतली आहे. मूल्यांकनाच्या सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत शहरवासीयांवर भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेऊ. - पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त