शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून सरासरी ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून सरासरी ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेला कमी कालावधीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर यंदा परीक्षेचा ताण आला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

कोरोनामुळे जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून या इयत्तांचे ऑफलाइन वर्ग भरू लागले. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजल्या नसल्याचे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी अनेक शाळांनी अभ्यासक्रम पहिल्यापासून शिकविण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. एक दिवस आड भरणारे वर्ग, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जादा तास घेण्यातील अडचणीमुळे उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम दीड महिन्यात पूर्ण करणे शाळांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करून उर्वरित अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

प्रतिक्रिया

ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शासनाने ५० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी.

-भारती गायकवाड, पालक, फुलेवाडी

ऑनलाइन शिक्षणातील काही संकल्पना आता वर्गातील प्रत्यक्ष शिक्षणामुळे समजल्या आहेत. त्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर अभ्यास, परीक्षेचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या वाढवावी.

-पार्थ वडगे, इयत्ता दहावी, राजारामपुरी

विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. तो कमी करण्यासाठी अभ्यासक्रम आणखी कमी करावा. तामीळनाडूप्रमाणे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा विचार शासनाने करावा.

-राजेश वरक, माध्यमिक शिक्षक, कोल्हापूर

चौकट

संभ्रम दूर व्हावा

ऑफलाइन परीक्षा घेण्याचे शासनाने स्पष्ट केले असले, तरी स्वरूपाबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. वर्णनात्मक की, एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.

कोल्हापूर विभागातील विद्यार्थी संख्या

दहावी : १,८४,४५९

बारावी :१,२१,१५९