शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

माजी सैनिकाच्या विधवा पत्नीची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्करूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्याकरिता या वीरपत्नीला तहसील कार्यालयामध्ये आणखीन किती चकरा माराव्या लागणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत ...

ठळक मुद्दे लालफितीचा फटका : भूखंडाची सनद मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटेसध्या त्या पत्रावजा घरामध्येच राहत असून सध्या हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाहीया जाग्यावर शासकीय लाभातून घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्याकरिता या वीरपत्नीला तहसील कार्यालयामध्ये आणखीन किती चकरा माराव्या लागणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लालफितीच्या कारभाराचा फटका देशासाठी सेवा दिलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीला बसत आहे.

माणगाव (ता. हातकणंगले) येथील शालन कांबळे यांचा विवाह हरोली येथील लष्करी सैनिक सुदाम जाधव यांच्याशी चाळीस वर्षांपूर्वी झाला होता. सुदाम जाधव लष्करमध्ये वीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर बेपत्ता आहेत. त्यांची शोधाशोध करून त्यांच्या पत्ता न लागल्याने त्यांची पत्नी विधवा म्हणून वावरत आहे. कांबळे यांना दोन अपत्य होती, पण तीही आजराने मृत झाल्याने शालन कांबळे या एकाकी जीवन जगत आहेत.फौजी कांबळे यांची हरोली येथे थोडी घरजागा व थोडी शेतीही आहे पण ती विवादित असल्याने या जागेचा उपभोग शालन कांबळे यांना घेता आला नाही. राहण्यास कोठे तरी आसरा मिळावा याकरिता त्या माणगाव येथे माहेरी आल्या.

येथे माहेरकडील नातेवाइकांनी प्रयत्न करून बेघरमधून घर मिळविण्याकरिता प्रयत्नही केला, पण ग्रामपंचायतीने शालन कांबळे यांना जागा देताना बेघरमधील पूर्वी दुसºया कुळानी वापरलेली जागा दिली. कालांतराने ही जागा मूळमालकाने दुसºया कुळाला विकल्याचा वाद उत्पन्न झाल्याने या वीरपत्नीस दुसरीकडे आसरा शोधावा लागला, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना बेघरमधूनच परत भूखंड घ्यावा लागला.सध्या त्या पत्रावजा घरामध्येच राहत असून सध्या हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. जो भूखंड दिला आहे, तो तर अडगळीतील तर आहेच, पण तेथे राहणे म्हणजे जिवावर उदार होऊनच राहावे लागत आहे.

या भूखंडावर घर बांधावे तर आर्थिक ताकद नाही. तसेच राहावे तर घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही अशी सद्य:परिस्थिती या वीरपत्नीची आहे. त्यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य झाकीर भालदार व बताशा कामत हे प्रयत्नशील आहेत, पण सध्या देण्यात आलेला भूखंड हा रितसर हस्तांतरित शालन कांबळे यांच्याकडे न झाल्याने या जाग्यावर शासकीय लाभातून घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत.माणगाव (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिकाची पत्नी असलेल्या शालन कांबळे यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याची मागणी होत आहे.